आसान्या कार्यालयाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

0
138

विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क यवतमाळ

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी विचारातून आणि लिखाणातून सामाजिक क्रांती केली त्यांच्या विचारांचा धागा पिढ्यानपिढ्या तेवत राहिला आहे.परखड लिखाणातून रंजलेल्या गांजलेल्या टिचलेल्या वंचितांची आर्त हाक प्रस्थापितांच्या कानावर आदळावी आणि वंचित समाजाला न्याय मिळावा यासाठी आपलं उभं आयुष्य मानवतेसाठी व शोषणमुक्त समाजासाठी समर्पित करणाऱ्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त आसान्या कार्यालयाच्या वतीने त्यांच्या भव्य प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर मृणालिनी दहीकर यांनी आपल्या विचारातून लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल माहिती देताना त्या म्हणाल्या महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान महत्वपूर्ण मानले जाते. वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मोठे योगदान आहे.

 स्वातंत्र्य, समता, न्याय ,आत्मसन्मान आणि आर्थिक समतोल निर्माण करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणारे,बंडखोरी करणारे, धाडसी,करारी शूरवीर आणि स्वाभिमानी नायक त्यांनी रेखाटले. साहित्यातून समाज प्रबोधन आणि त्यातून समाज परिवर्तन हेच त्यांच्या साहित्याचे सूत्र होते असे अण्णाभाऊंचे साहित्य क्षेत्रातील योगदान आणि शोषितांसाठी त्यांनी समर्पित केलेलं आयुष्य हे अमूल्य आहे असे त्या म्हणाल्या यावेळी खंडारे साहेब, नितेश मेश्राम नितीन पाटील, सिसले, गायकवाड, डोंगरे आणि महिला भगिनी तसेच जयंती उत्सव मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी अन्य मान्यवर नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here