सुरेश पाचभाई मारेगाव,
मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने विजेचे भारनियमन बंद करणे तसेच शेतीसाठी 24 तास वीज मिळावी या तसेच अन्य मागण्यासाठी मारेगाव तालुका काँग्रेसचे वतीने आमरण उपोषणाला दि.23 ऑक्टोबरपासून सुरुवात करण्यात आली.
मारेगाव तालुका हा अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे.कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ.यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये कधीही सातत्य राहत नाही.दरवर्षी बेभरोशाच्या वातावरणामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत बुडत जात असतो. अशातच आता शेतातील पिकांना पाण्याची नितांत गरज असतांना वीज मंडळाकडून अघोषित भारनियमन सुरु करण्यात आलेले आहे.

हे भारनियमन पूर्णतः बंद करण्यात यावे,शेतकऱ्यांना सिंचनाकरिता 24 तास वीज उपलब्ध करून देण्यात यावी,मारेगाव तालुक्यात 132 के व्ही चे उपकेंद्र सुरु करण्यात यावे,ग्राहकांची संख्या जास्त असल्याने नवीन वीज उपकेंद्राची मान्यता देण्यात यावी,33 केव्ही चे नवीन वीज उपकेंद्र वनोजा देवी,कुंभा,वेगाव रोहपट येथे उभारण्यात यावे,मारेगाव तालुक्यात सोलर प्लांट तयार करून जास्तीची वीज निर्मिती करण्यात यावी,शेतकऱ्याचे वीजबिल माफ करण्यात यावे,
नवीन कृषिचे पंपाचे कनेक्शन त्वरित जोडणी करून देण्यात यावे अशा विविध मागण्या पूर्ण करून जनतेला न्याय मिळावा याकरिता मारेगाव तालुका काँग्रेसच्या वतीने माजी आमदार वामनराव कासावार यांचे मार्गदर्शनात काँग्रेसचे जेष्ठ नेते नरेंद्र पाटील ठाकरे यांचे प्रमुख उपस्थितीत मारेगाव तालुका काँग्रेस चे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार,मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराना, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष आकाश बदकी, अंकुश माफूर, यांनी सदर उपोषण हे 23 ऑक्टोबर रोज सोमवार पासून मारेगाव येथील मार्डी चौकातील पोलीस वेलफेअर पेट्रोलपंपा समोर सुरू झाले.