बुरांडा ते खापरी रस्ता मोजतोय अखेरची घटका

0
102

– रस्त्यात गिट्टीचे व खड्याचे साम्राज्य.

– अर्धवट कामामुळे खापरी ग्रामस्थ त्रस्त.

सुरेश पाचभाई मारेगांव,

मागील अनेक वर्षांपासून नरकयातना भोगत असलेला बुरांडा ते खापरी या रस्त्याचे काम अजूनही अर्धवटच आहे. या रस्त्यावरील गिट्टी पूर्णपणे उखळून असल्याने येथील नागरिकांना या रस्त्याने चालतांना नरकयातनाच भोगत असल्याचा भास होत आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षातही नागरिकांचे हाल मात्र कमी नाही.

मारेगाव तालुक्यातील खापरी येथे जाण्याकरिता हा एकमेव मार्ग असुन हा अखेरची घटका मोजत आहे. बुरांडा ते खापरी हा अडीच किमीचा रस्ता आहे. त्यापैकी जवळपास दोन किमीच्या रस्त्याचे काम झालेले आहे. अर्धा किमीच्या रस्त्याचे काम बाकी आहे.पावसामुळे अर्धा किलो मीटर रस्त्याची अवस्था एवढी बिकट झाली आहे की वाहन तर दुरच राहीले पण पायदळ चालणे सुद्धा कठीण होऊन बसले आहे.

जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या खापरी ते बुरांडा रस्ता हा गेल्या वर्षी पंधरा वर्षांनंतर तयार करण्यात आला आहेत.पण तो ही केवळ दोन किलोमीटर रस्त्याचे काम करण्यात आले आहे.उखळलेल्या रस्त्याने अनेकांच्या दुचाकी पंचर होत आहे.गावात चार चाकी वाहन येणे तर दुरच राहिले एखाद्याचे आरोग्य बिघडल्यास त्याला येथुन तालुक्याच्या ठिकाणी येण्यास मोठी कसरत करावी लागते.आणि बाहेरगावी शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना गिट्टी व खड्यामुळे अथक त्रास सहन करावा लागतो आहे.

सन 2021- 2022 च्या मे महिन्यात अडीच की.मी.पैकी फक्त दोन किलोमीटर रस्त्याचे काम करण्यात आले होते.उर्वरित अर्धा की.मी.रस्ता पूर्णताहा उखडून मोठ मोठे खड्डे तयार झाले आहे.या रस्त्याने पायदळ चालने सुद्धा कठीण बाब आहे.अर्धवट काम झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या रस्त्याने ये -जा करणाऱ्याला वाटते की रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येत असुन उर्वरीत अर्धा किलोमीटर रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा अशी गावातली नागरिकांनची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here