दाभाडी , वल्हार्सा गावातील पाणी टंचाई  समस्या कायम

0
85

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

सविस्तर वृत्त असे की.
झरी जामणी तालुक्यातील काही गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येते . दाभाडी गट ग्रामपंचायत मध्ये असलेल्या  70 कुटूंब ची लोक वस्ती असलेल्या  मोठी दाभाडी  गावात एकच बोरवेल असून  काही वर्षांपूर्वी  त्यामध्ये सोलर पंप बसविण्यात  आला आहे . परंतु सोलर मध्ये बिघाड झाल्याने आता थेट विद्यूत पूरवठा करून पंप सुरु आहे .

त्यातून खूप बारीक पाण्याचा प्रवाह येत असल्याने  पाण्यासाठी महीलांना वाट पाहत बसावे लागत आहे . गावात एकच पाणी पुरवठ्याचे साधन असल्याने  पाण्यासाठी भांड्याची रांग लावून बसावे लागत आहे . विशेषतः महिलांना पिण्या करिता घरगुती वापरासाठी पाणी मुबलक मिळत नसल्याने रोजमजुरी ,कामधंदा करून  पाण्यात साठी संघर्ष करावा लागत आहे .
      
        त्याचप्रमाणे याच ग्रामपंचायत मध्ये  असलेल्या 60 घरांची  वस्ती असलेल्या वल्लार्सा या गावात सुद्धा  उन्हाळ्यात पाणी समस्या निर्माण होतात . गावापासून 500 मीटर अंतरावर असलेल्या विहारीतून पाणी काढून आणावे लागत आहे.  उन्हाळ्यात  विहीरीची पाण्याची लेवल  खाली गेली असल्याने फार कमी लोकांना पाणी मिळतात . त्यावर सोलर पंप व टाकी बसविण्यात आली आहे पण तेही बंद पडली आहे .  वृद्ध ,महिला पुरुष डोक्यावर घागर घेऊन पाणी भरतांना दिसून येते आहेत . तर काही सदन कुटूंब गावा जवळच्या शेतातून 200 रु . महिना प्रमाणे पाणी विकत घेत असल्याचे सांगण्यात आले आहे.


        पाणी पुरवठा योजना या गावासाठी मंजूर करण्यात आली आहे. गावापासून काही अंतरावर पाणी पुरवठा करण्यासाठी 7 लाख खर्चकरून विहीर खोदण्यात आली आहे . परंतु या योजनेचे नेमके कुठे पाणी मुरत आहे हे गावकऱ्यांनाही कळले नाही.दरवर्षी पाणी टंचाई आढवा होतात ,गावकरी समस्या मांडतात , लोक प्रतिनिधी कडून  तात्काळ व्यवस्था करण्याचे आदेश दिले जाते ,  प्रशासनाकडून  हो ला हो करून पोकळ  अश्वासन दिले जातात  . मात्र शेवटी समस्या कायम राहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here