इंदिराग्राम येथील घटना.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव तालुक्यातील इंदिराग्राम येथील सुमारे 26 वर्षीय विवाहित महिलेने विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 8 सप्टेंबर 2022 रोज गुरुवारला सकाळी 8 वाजताच्या सुमारास घटना उघडकीस आली.
सविस्तर वृत्त असे की.
तालुक्यातील एका पाठोपाठ एक आत्महत्यांचे सत्र सतत सुरु आहेत. ते थांबताना मात्र दिसून येत नाही. शासन स्तरावरून यावर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही अथवा या थांबण्यासाठी ठोस पावलेही उचलले जात नाही.
इंदिराग्राम येथील मिरा राजू आत्राम वय सुमारे (26) वर्ष रा. इंदिराग्राम असे आत्महत्या केलेल्या विवाहीत महिलेचे नाव असून मिळालेल्या माहिती नुसार मिरा यांनी दिनांक 8 सप्टेंबर 2022 रोज गुरुवारला सकाळी 8 वाजताच्या सुमारास स्वतःच्या राहते घरी विषारी किटकनाशक प्राशन केल्याची माहिती त्यांच्या कुटबियांना मिळताच कुटुंबियांनी तातडीने उपचारांसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
पण येथील डॉक्टरनी तिला मृत्यू घोषित केल्याची महिती प्राप्त झाली आहे. असून मिराबाई यांच्या पश्चात पती आणि मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे.त्याच्या आत्महत्येचे कारण अजुन गुलदस्त आहे.पुढील तपास मारेगाव येथील ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस जमादार राजु टेकाम, मोहन कुळमेथे करीत आहेत.