कोसारा (सोईट) पूल पाण्याखाली यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्याचा संपर्क तुटला.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊसामुळे वर्धा नदीला पूर आला असून कोसारा (सोईट) गावाजवळील वर्धा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की.
सततच्या पावसाने तालुक्याला अक्षरशः झोडपले असून अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेलेली आहे. तर कित्येक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र मारेगाव तालुक्यात दिसून येत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीला तलावाचे स्वरूप आल्यासारखे दिसत आहे. तर आज दिनांक 12 सप्टेंबर 2022 रोज सोमवारला कोसारा पुलावरून सुमारे सात फूट पाणी असून यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याचा संपर्क तुटलेला आहे. प्रशासन अलर्ट असून नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन केले जात आहे.
मागील दोन दिवसा पासून सुरु असलेल्या सततधार पावसाने संम्पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे घराबाहेर कोनालाही पडण्याची संधी मिळाली नाही. शेतकऱ्यांची शेती कामे खोळबली आहे. शेती कामे बंद असल्यामुळे शेतमजूरांना मजुरीवर पाणी सोडावे लागले. पावसामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी ओसांडून वाहत आहे.तालुक्यातील नदी,नाले, विहिरी तुडुंब भरलेले आहेत. तालुक्यातून वाहणारी वर्धा नदी ही दुथडी भरून वाहत आहे.

त्यामुळे चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या कोसारा पूल पाण्याखाली आला असून या पुलावरून सुमारे सात फूट एवढे पाणी वाहत आहेत.पावसामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.मारेगाव तालुक्यातील अनेक गावच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प होती.तालुक्यातील मार्डा येथील डॅमवरूनही पाणी ओसंडून वाहत आहे.
पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. सतत सुरु असलेल्या पावसाने शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहेत. हातात आलेली पिके जाते की काय अशी भीती शेतकऱ्या मध्ये निर्माण झाली आहे. तालुक्यातील नदीसोबतच नालेही भरून वाहत असून नागरिकांनी दक्ष राहावे असे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे.
