नितीनजी गडकरी केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री भारत सरकार यांना प्रसाद सुधाकर ढवस यांचे निवेदन.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती करून देण्याबाबत. प्रसाद सुधाकर ढवस भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सचिव यवतमाळ मारेगाव यांचे वतीने दिनांक 16 ऑक्टोबर 2022 रोज रविवारला नागपूर येथे निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील रस्ते पूर्णपने मृतावस्तेत पोहचले आहे. विशेष करूण ग्रामीण भागातील वनोजा (देवी) ते शिवणी (धोबे ) मार्डी ते कुंभा करणवाडी ते खेरी हिवरा ते मार्डी मार्डी ते मारेगाव,मार्डी ते वणी हे रस्ते दोन तालुक्याला जोडणारे असून या भागातील रस्त्यांवरचे डांबरीकरण पूर्णपने उखडले आहे. व मोठमोठे खड्डे पडले आहेत.
आणि हे रस्ते अखेरची घटका मोजत आहे.त्यामूळे अपघाताच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे.आज पर्यंत छोटे व मोठे बरेच अपघात झाले हे वास्तव्य आहे.त्या मुळे या मार्गाने रस्त्यांवरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.दुचाकी तर दूरच राहिली साधे पायदळ चालणे सुध्दा कठिण झाले आहे.
त्याच प्रमाणे शाळाकरी मुला मुलींना शाळा व महाविद्यालयात शिक्षणा करीता शहरी भागात जाण्याकरिता रस्त्यांमुळे कमालीची कसरत करत मार्ग काडावा लागत आहे.त्या मुळे मुलांना वेळेवर शाळेत व महाविद्यालयत पोहचायला उशीर होत आहे.याचा मुलांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे.असे निवेदन प्रसाद सुधाकर ढवस भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सचिव यवतमाळ यांनी नितीनजी गडकरी केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री भारत सरकार यांना निवेदन दिले आहे.