सदोष रस्ता तयार करण्यासाठी सरपंच संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
झरी जामणी तालुक्यातील अहेर अल्ली येथील रेल्वे पूला खालून जाणाऱ्या बोगद्यामुळे अनेक अपघात होत आहे.पावसाळ्यात पाणी व चिखल साचत असल्याने लोकांना तसेच शाळकरी मुलांना शाळेत जाणे त्रासदायक ठरत आहे.तसेच रेल्वे पूला खालून येणारे व जाणारे दोन्ही बाजूकडील वाहन जावे अशी व्यवस्था रेल्वे प्रशासनाने दुसरा पूल उभारून करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अहेर अल्ली येथील रेल्वे पूला खालूल जाणारा रेल्वे बोगदा एकदम अरुंद खोलगट तिरकस असल्यामुळे दोन्ही बाजूने येणारे लहान मोठे वाहने एकमेकांना दिसत नाही.राष्ट्रीय मार्ग क्र. ७ जोडण्यात आल्याने येथे मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते.११ नोव्हेंबर रोजी धानोरा येथील रामदास तुडमवार नामक इसमाचा याच पुलाखाली बसच्या धडकेत मृत्यू झाला. त्यामुळे अपघातात मृत्यू झालेल्या तुडमवार यांच्या कुंटुबीयांना रेल्वे प्रशासनाने आर्थिक मदत द्यावी.
त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला रेल्वेमध्ये नोकरी द्यावी.अहेर अल्लीचे सरपंच यांनी या पुलाबाबत रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करून ही कारवाई करण्यात न आल्याने रेल्वे प्रशासनाविरोधात सरपंच संघटना सह ग्रामवासीयांत प्रचंड रोष आहे.
तसेच येथे वाहतुकीसाठी दुसऱ्या बोगद्याची निर्मिती करण्याची मागणी करण्यात आली आहे.सर्व मागण्यांचे निराकरण १५ दिवसात न केल्यास रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी तहसीलदारांना निवेदनातून देण्यात आला. यावेळी सरपंच संदीप बुरेवार, नीलेश येल्टीवार, हितेश राऊत, राहुल दांडेकर संतोष,हरिदास गुर्जलवार,रमेश रोडावार,शंकर आकुलवार,इत्यादींनी दिला आहे .