¶ बि-बीयाने खते नव्या दिमतीने खरेदीची लगबग.
सुरेश पाचभाई मारेगाव,
मारेगांव मान्सूनपूर्व तयारी करून नव्या हंगामात बळीराजाने खरिपाची तयारी केली आहे.या वर्षी तालुक्यात 44 हजार 500 हेक्टर क्षेत्र तालुक्यात शेतशिवार असुन सर्ज्या राज्यासह शेतकरी खरीप पेरणी सज्ज झाला आहे.मान्सूनच्या सरी बरसताच पेरणीची लगबग सुरू होणार आहे.पावसाचे प्रमाण समाधानकारक असावी अशी शेतकरी अपेक्षा करीत आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करणारा हाच तो जगाचा पोशिंदा एकमेव योध्दा होय.
या वर्षी सुध्दा खरीप हंगामात कपासींचा सर्वाधिक म्हणजे 33 हजार 892 हेक्टरवर कपासीची लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.त्या खालोखाल सोयाबीन पिकाचा पेरा राहणार असून 5 हजार 765 हेक्टरवर सोयाबीन पिकाचा पेरा होणार आहे.तर तुर पिकाचा पेरा 4 हजार 598 हेक्टर वर होणार आहे.
यावर्षी कपासींचा पेरा जास्त राहणार असल्याने कापूस बियाणांची लगबग शेतकऱ्यांनी सुरू केली असून गेल्याकाही वर्षात सतत येणारी गुलाबी बोन्ड अळीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मागच्या वर्षी पासुन शेतकरी कपाशीचे लवकर येणारे वाण घेण्याकडे जास्त कल दिसुन येत आहे.कापसाची वाढती मागणी बाजारात दिसुन येत आहे.
दरम्यान बळीराजाने खरिपाची तयारी केली असून मान्सूनपुर्व कामे अंतिम टप्प्यात आले असून शेतकऱ्यांना मान्सून पूर्व पावसाची प्रतीक्षा आहे.शेतकऱ्यांना बियाणे व खते कमी पडणार नाही संपूर्ण साठा तालुक्याला उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.