रस्त्याच्या अर्धवट कामामुळे नागरिक भोगताहेत नरकयातना.
हिवरा मजरा ते मुकटा रस्त्याची दैनावस्था.
विदर्भ एस. पि. न्युज नेटवर्क मारेगांव,
मारेगांव तालुक्यातील हिवरा ते मुकटा रस्त्याच्या अर्धवट कामामुळे नागरिकांना नरकयातना भोगायला लागत असल्याची परिस्थिती हिवरा ते मुकटा या रस्त्याची आहे. गेल्या वर्षांपासून सुरु झालेले काम अजूनही अपूर्णांवस्थेत असल्याने यावर्षीही पावसाळ्यात या गावातील नागरिकांसह विद्यार्थ्यांना मोठया त्रासाला सामोरे जाण्याची वेळ पुन्हा येऊन ठेपल्याचे दिसत आहे.
वर्धा नदीच्या काठावरील आणि राजकीय व सामाजिक दृष्टया उपेक्षित असलेले तालुक्यातील हिवरा ते मुकटा या सुमारे तिन किलोमीटर रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर झालेले आहे.असुन रू 175.53 लक्ष प्रस्तावीत कामाची रक्कम आहे.तर 5 वर्ष देखभाल व दुरुस्ती करण्याची किमत रू 16.91 लक्ष आहे.रस्त्यावर चार ते पाच पूल मंजूर असून त्यापैकी दोन पुलांचे काम पूर्ण असून उर्वरित पूल अजूनही स्लॅबच्या प्रतीक्षेत आहे.

रस्त्यावर काही ठिकाणी गिट्टी टाकलेली आहे.काही ठिकाणी बरोबर दबाई केलेली नसल्याने नागरिकांना वाहन चालवतांना मोठी कसरत करावी लागते.जागोजागी गिट्टी उखरलेली आहे. व चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.त्या मुळे हा रस्ता अखेरची घटका मोजत आहे.या कामाला सुरवात होऊन एक वर्षाचा कालावधी लोटला तरी कामाच्या प्रगतीवरून यावर्षी पावसाळ्यात काम पूर्ण होईल याची गॅरंटी कमीच आहे.
या गावातील नागरिकांना काही कामानिमित्त तहसील कार्यालय किंवा तालुक्याच्या इतर कामाला जायचे असल्यास त्यांना वरोरा वणी मार्गे मारेगावला यावे लागते.रस्त्याच्या अर्धवट कामामुळे आणि रस्त्यावर असलेल्या माती मिश्रित मुरुमामुळे पावसाळ्यात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.त्यामुळे इतर सोयीसुविधा येथील नागरिकांना मिळत नाहीच उलट येथील शाळकरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होत असते.त्यामुळे त्वरित या रस्त्याचे काम करण्यात यावे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहे.