प्रत्येक गावात करतात बेभावाने खरेदी
सुरेश पाचभाई मारेगांव,
मारेगाव तालुक्यातील बोटोणी परीसरात गेल्या पंधरा दिवसांपासून कापुस खेडा खरेदीला मोठया प्रमाणात उत आलाय.हे खरिददार तालुक्यासह बाहेर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात विणापरवाना कापुस खरेदीची धुम सुरू आहे.मारेगाव तालुका हा आदिवासी बहुमुल तालुका आहे.तालुक्यामध्ये मोठया प्रमाणात आदिवासी बांधव राहते.
त्या मध्ये त्यालुक्यातील बोटोणी परीसरात मोठ्या प्रमाणात पोड वस्त्या आहे. हे खरिददार पोडामध्ये जावून अशिक्षित आणि गरीब शेतकरी लोकांच्या गैर फायदा घेत मनमानी भाव ठरवुन कमी भावात कापुस खरीदी करत असल्याचे वास्तव आहे.बाजार भावा पेक्षा कमी दरात कापुस खेडा खरेदीला मोठया प्रमाणात जोर आलाय.
शेतकरी हा आधीच अतिवृष्टी व पुर् बुडाई आणि दुबार – तीबार पेरणी करून शेतकरी मेटी कुटीस आला आहे.व हवादिल झाला आहे.त्या मध्ये बळीराजाचा कापुस बे भाव आणि मनमानी कारभाराने राजरोषपणे खरेदी करून नेत आहे. याला आळा बसणे अत्यंत गरजेचे झाले आहे.अशी परिसरातील नागरीकची मागणी आहे.
त्यांच बरोबर परीसरात भामटे कापुस चोर पण मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहे.अनेक शेतकऱ्याच्या शेतातील कापुस चोरी जात आहे.व बरेच शेतकऱ्यांनी थोडा फार कापुस चोरी गेल्या मुळे तक्रार दिली नसल्याची गावा गावात चर्चा आहे.
त्या मध्ये हे भामटे चोर उपद्रव करत आहे.शेतकऱ्याचा शेतात हात साफ करत असल्याची गावा गावात चर्चा आहे .यांना आळा बसणे अत्यंत गरजेचे झाले आहे.तरी संबंधीत विभागाने अशा खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिका कडून केली जात आहे.