अनेक शेतकऱ्याचा शेतमालाला फटका
सुरेश पाचभाई :- संपादक विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क मारेगाव,
मारेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसात तापमानात कमालीचा बदल झाला होता त्यातच काल दिनांक १७ मार्च २०२४ रोज रविवारला रात्री ८:३० वाजताच्या सुमारास गारा सह अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली.

असुन तालुक्यातील बोटोनी परिसरातील बुरांडा, हटवांजरी,खापरी,खडकी घोडदरा सह अनेक गावात गारा सह अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्याचा गहु,ज्वारी या सह अनेक पिकांना याचा फटका बसला आहे.तालुक्यात गेल्या काही दिवसा पासून वातावरणात कमालीचा बदल दिसुन आला तर काल रविवारला रात्री ८:३० वाजताच्या सुमारास गारा सह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.

तब्बल एक तास पावसाची रिमझिम सुरू होती.या मुळे शेतकरी आणखी एकदा आस्मानी संकटात सापडला आहे. हाता तोंडाशी आलेला शेतमाल जाण्याच्या मार्गावर आहे.अवकाळी पावासामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

अवकाळी पावसामुळे व गारा मुळे शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पिके वाया गेली असुन नुकसान झालेल्या भागातील पिकांचे पंचनामे तातडीने करण्यात यावे अशी मागणी शेतकरी करत आहे. व झालेल्या पिकांची नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करत आहे.