वीज पडून चार बोकड ठार

0
78

मजुराचे 80 हजाराचे नुकसान

सुरेश पाचभाई मारेगाव,

शेतामध्ये चिंचेच्या झाडाखाली उभ्या असलेल्या चार बोकडांवर वीज कोसळली. यात चारही बोकडांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना तालुक्यातील चिंचमंडळ गावाजवळील धानोरा शिवारात घडली. यात मजुराचे 80 हजाराचे नुकसान झाले असून त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळलेले आहे.

चिंचमंडळ येथील लक्ष्मण लटारी कळसकर यांच्याकडे शेती नाही. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी त्यांनी नरेंद्र पा.ठाकरे यांची धानोरा शिवारात असलेली शेती ठेक्याने केली होती.उन्हाळा असल्यामुळे शेतात कोणतेही पीक नसल्याने त्यांनी आपल्या बकऱ्या या शेतामध्ये चारायला नेल्या होत्या. दि.12 मे ला दुपारी 3 च्या दरम्यान आकाशात ढग दाटून आले.

आणि अचानक वादळ, वारा आणि विजांच्या कडकडाटाला सुरुवात झाली.पाऊसही लागला.त्यामुळे शेतातील काही बकऱ्यांनी घराचा रस्ता धरला.परंतु चार बोकड हे शेतामध्ये असलेल्या चिंचेच्या झाडाखाली उभे राहिले.अशातच वीज चमकली आणि चिंचेच्या झाडाखाली उभ्या असलेल्या या चारही बोकडांवर पडली.यात चारही बोकडांचा जागीच मृत्यू झाला.अचानक घडलेल्या या घटनेने मजुरावर मोठे आर्थिक डोंगर कोसळले असून शासनाकडून मोठया मदतीची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here