वणी येथील उद्धव ठाकरे यांचे सभेला उसळला अलोट जनसागर

0
1119

महाराष्ट्रात गांडूळांची नाही वाघाची पैदास होते -उद्धव ठाकरे

वणी येथील जाहीर सभेत केले महाविकास आघाडीला निवडून देण्याचे आवाहन

तालुका प्रतिनिधी वणी

वणी येथील आज झालेल्या शासकीय मैदानावरील आयोजित सभेत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात गांडूळांची नाही तर वाघाची पैदास होते असे उद्गार काढले. कारण महाराष्ट्र हे मर्द मावळ्यांचे राष्ट्र आहे. येथे दुसऱ्यांना लुटल्या जात नाही तर लुटणाऱ्यांचे हात छाटले जाते ते वणी येथील आयोजित सभेमध्ये शिवसेना ( उबाठा ) चे तसेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान बोलत होते. यावेळी मंचावर खासदार प्रतिभा धानोरकर,परिसरातील उमेदवार आणि सर्व घटक पक्षाचे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की,मी वणीला उतरताच माझी बॅग तपासली.मी म्हटलं तपासा. पण तुमच्या बॅगा कोण तपासणार? हा तर लोकशाहीचा अधिकार आहे.आमच्या सोबत सत्ताधाऱ्यांच्याही बॅगा तपासा.कारण हा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा अधिकार आहे.पंतप्रधान वारंवार बोलतात की आम्ही कलम 370 रद्द केले. परंतु या 370 कलमचा महाराष्ट्राला काय फायदा?

महाराष्ट्रात जे आवश्यक आहे ते शेतकऱ्यांना भेटलं पाहिजे.इथे असलेल्या शेतमालाला भाव नाही. इथल्या कापसाला आणि सोयाबीनला भाव भेटला पाहिजे.मोदी शासनाने अदानीला शाळा दिली.एअरपोर्ट,बंदर दिले.वीज प्रकल्पसुद्धा दिले.पुन्हा काय काय देणार सांगता येत नाही.एकीकडे महाराष्ट्र लुटेंगे और दोस्तो मे बाटेंगे अशी पद्धत सुरू आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना चालू करू.पाच जीवनाश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेऊ.ज्यात तेल, साखर,गहू,तांदूळ आणि दाळ यांचा समावेश राहील. सर्वांना मोफत शिक्षण मिळेल आणि महाराष्ट्राला जुने वैभव परत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे उद्धव ठाकरे आपल्या भाषणामध्ये म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here