बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

0
2089


अर्जुनी येथील तलावामधील घटना

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील अर्जुनी येथील तलावामध्ये एका 16 वर्षीय मुलाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दिनांक 25 मे 2025 रोज रविवारला सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

राकेश मोहन आत्राम वय अंदाजे 16 वर्षे रा. कुटकी ता. हिंगणघाट जि.वर्धा असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

राकेश हा नव्या वर्गामध्ये शिकत होता.त्याच्या शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे तो काही दिवसापासून अर्जुनी येथे आजोबाकडे राहत होता.आज सकाळी तो आजोबा बाहेरगावी गेल्याने आजोबाचे बैल पाणी पाजण्यासाठी अर्जुनी येथील तलावाकडे घेऊन गेला होता.बैल घेऊन शेताकडे गेला पण बराच वेळ झाला तरी मुलगा घरी परतला नाही.

त्यामुळे कुटुंबातील काही सदस्य त्याचा शोध घेण्यासाठी तलावाच्या दिशेने गेले असता त्यांना मुलगा घसरून तलावामध्ये बुडून असल्याचे दिसून आले.त्यांनी सदर घटनेची माहिती लगेच गावातील पोलीस पाटील यांना दिली.पोलिस पाटीलयांनी लगेच सदर घटनेची माहिती मारेगाव पोलीस स्टेशनला दिली.

माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळ पंचनामा करून त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. त्याच्या पश्चात आई-वडील व दोन बहिणी असा प्राप्त परिवार आहे.सदर घटनेचा पुढील तपास ठाणेदार संजय सोळंके यांचे मार्गदर्शनाखाली जमादार दिगंबर कनाके करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here