येडशी ग्रामपंचायत चा भोंगळ कारभार

0
101

दुषित पाणीपुरवठा , हायमास्ट लाईट बंद , नाली सफाई कडे दुर्लक्ष.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी :- तालुक्यातील येडशी गावात सध्या पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होताना दिसत आहे.सद्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे.पाण्याची पातळी खोल गेली आहे.त्यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.सद्या येडशी गावात ग्रामपंचायत चे शून्य टक्के नियोजन असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी गावातले काही हायमोस्ट (ट्रीट लाईट) बंद आहे.त्या कडे सुद्धा ग्रामपंचायत फिरून सुद्धा पाहत नसल्याचे दिसून येत आहे.मात्र लाईट बंद असल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना रात्रीच्या वेळेस त्रास सहन करावा लागत आहे. सुमारे एक ते दीड वर्षे उलटून गेले मात्र गावामध्ये कोणतेही कामे मंजूर करून काम न केल्याचे दिसून येत आहे.सद्या कंपनी मार्फत एक R/O सुरू आहे.मात्र नदी वरून पाईप लाईन टाकून असल्याने नदी पात्रातील विहिरी मध्ये टाकलेली मोटर बाहेर काढून ती नदीमध्ये सोडण्यात आली आहे.

त्यामुळे जो नळाद्वारे पाणीपुरवठा होतो तो पूर्णपणे दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे दिसून येत आहे.जर गावामध्ये शुद्ध पाणी पुरवठा करायचा झाला तर ग्रामपंचायत ने ताबडतोब बोअर वेलची व्यवस्था करावी. जेणेकरून गावामध्ये शुद्ध पाणी पुरवठा होऊ शकतो.कारण या दूषित पाण्या मुळे काहींना आजरांचा सामना देखील करावा लागत आहे.सद्या गावामध्ये R/O सुरू आहे.थंड पाणी नेण्यासाठी गावातील प्रत्येक व्यक्ती तिथे येतात आणि लोकांची गर्दी उसळलेली पाहायला मिळत आहे.

जेव्हा पासून गावामध्ये R/O सुरू झाला तेव्हा पासून प्रत्येक दुकानात पाच रुपयांच्या नाण्यांचा शार्टेज पहायला मिळत आहे.गावामध्ये सात ते आठ दुकाने आहेत मात्र त्यांचा कडे कधीही गेले तरी पाच रुपयांची नाणी उपलब्ध राहत नाही.
कारण गावामध्ये कोणताही व्यक्ती आला त्यांना पाण्याची आवश्यकता असते.मात्र दुकानांमध्ये पाच रुपयांची नाणी नसल्याने त्यांना खाली हात परतावे लागते.

याच कारण ही असच असू शकते.सर्व पाच रुपयांची नाणी R/O फिल्टर मध्ये आहे.गेले दोन महिन्या पासून R/O (ATM) कार्ड ग्रामपंचायत मध्ये जमा आहे.मात्र ग्रामपंचायत च्या अति भोंगळ कारभारा मुळे संपूर्ण गाव वैतागून आहे.जर वेळीच कार्ड धारकांना कार्ड वाटप केले असते तर पाच रुपयांच्या नाण्यांची टंचाई उपभोगली नसती.मात्र ग्रामपंचायत च्या कारभारामुळे गावकरी त्रस्त आहे. या गंभीर विषयाची त्वरित दखल घेण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here