१ लाखाचे शेतकऱ्यांचे नुकसान.
तालुक्यात वाघाची दहशत.
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
झरी जामणी उन्हाळ्यात शेवटचा महिना चालू असून जंगलातील नाल्या मधील पाणी सुकून गेल्याने पाण्याची भटकंती करत वाघासह इतर वन्य प्राणी पाण्याचा शोधत गावाच्या दिशेला येणे सुरु झाले. संबंधित विभागाने कृत्रिम पाणवठे तयार केले पण तेही कागदावरच दिसत असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे. या परिसरातल वनविभाग दुर्लक्ष करत असल्याचे शेतकरी व जनतेमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहेत.
दिनांक ०२/०६/२०२२ रोजी पवणार येथे वाघाने दुधाळ मैसीची शिकार केल्याची घटना घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे कि,येथील शेतकरी सूर्यकांत मिलमीले यांचेकडे बैलजोडी,गायी व एक मुर्रा जातीची मैस अशे पशुधन आहेत.त्यांचे शेती पवणार तलावाच्या बाजूलाच असल्याने मैस सायंकाळी मिलमीले यांची नजर चुकवून तलावाच्या दिशेने गेली परंतु रात्री घराकडे वापस न आल्यामुळे मिलमीले यांनी शोधाशोध घेतली परंतु खुप शोधूनही त्यांना मैस मिळाली नाही.

सकाळी जेव्हा ते परत शोध घ्यायला गेले असता म्हैस मृत अवस्थेत आढळली, व म्हैसीच्या मागचा भाग वाघाने पूर्णपणे खाल्ला होता. या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांची टीम घटनास्थलावर हजर झाली.पंचनामा करण्यात आला असून त्या ठिकाणी cc tv कॅमेरा लावण्यात आला आहे.तसेच याच ठिकाणावर दोन् दिवसापूर्वी पवणार येथील शेतकऱ्यांच्या म्हैसीच्या पिल्लाला वाघाने ठार केले.
सतत होत असलेल्या वाघाच्या हल्ल्यामुळे परिसरातील शेतकरी शेतमजूर यांच्या मध्ये दहशत निर्माण झाली आहे.आता खरीप हंगाम तोंडावर आला असल्यामुळे शेतीचे कामे कसे करावे हा प्रश्न शेतकऱ्या समोर उभा आहे.तरी वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरात होत आहेत.