विजा ‘पावसात व वाघाच्या दहशतीत जागलीची पाळी.
वनविभागाकडून उपाय योजना शुन्य.
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
झरी तालुक्यात :- जंगल जास्त प्रमाणात असल्याने रानटी जनावरांचा शेतकऱ्याना अतिशय त्रास आहे.वानर,रोही व रानडुकर या रानटी प्राण्याचा सर्वात जास्त प्रमाणात शेतीचे नुकसान करत आहेत.यावर्षी उशिरा खरिपाच्या पेरणी सुरू झाली आहे. प्रामुख्याने कपासी , सोयाबिन व तुर या पिकाची जास्त प्रमाणात लागवड केली जाते.
यावर्षी पावसाचे प्रमाण कमी व अनियमित असल्या कारणाने दुबारा पेरणी करावी लागल्याने बीयाणाचा खर्च वाढला आहे.यातच आता रानटी जनावरांचा मोर्चा शेताकडे वळवला असून पेरणी केलेले पिक रानटी प्राणी उध्वस्त करत आहे.सोयाबीन जमिनीमधून रानडुकर उखरून खात आहे.
पऱ्हाटीमध्ये लावलेल्या तुरीच्या ओळी च्या ओळी रातुन गायब करत आहेत.तर कोवळे पिक रोही खात आहेत.एकीकडे एक एकर सोयाबीन बियानासाठी चार हजार रुपये मोजावे लागत आहे. तसेच इतर बियाणे महाग झाले आहे.परंतु हे महागडे बियाणे रानटी प्राणी रातून फस्त करत असल्याने शेतकरी हवालदिल आहे.
Suresh pachbhai
कोवळे पिक वाचविण्यासाठी शेतकरी वाघाची दशत,विजांच्या कडकडाटात पाणी पावसात रात्री जागल करतांना दिसत आहे .दिवसभर काबाडकष्ट करून रात्रीच्या वेळी जागल पाळी शेतकऱ्यांवर आली आहे.
रानटी प्राण्याचा बंदोबस्त करण्याची वारंवार मागणी होत असताना मात्र वन विभागाकडून कोणतीही उपाययोजना केल्या जात नसल्याने दिसत आहे.जंगला लगतच्या शेतकऱ्यांना पिकं संरक्षण करण्यासाठी झटका माशिन देण्याचे आश्वासन दिले परंतु अजून देण्यात आल्या नाही .