शिक्षकाने दिला पूरग्रस्तांना मदतीचा हात.

0
63

वेतनातून 20 हजार रु. कपातीचे दिले गट शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मागील 20 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळल्याने वर्धा नदीला महापूर येवुन हजारो हेक्टर शेती पीके खरडून गेली, तर अनेकांच्या घराची गावात पाणी शिरुन पडझड झाल्याने अस्मानी संकटाचा सामना करण्यास हतबल झालेल्या शेतकरी शेतमजुरांना, सामाजिक भान जपत एका संवेदनशील प्राथमिक शिक्षकाने मदतीचा हात पुढे करत त्यांच्या वेतनातून 20 हजार रुपये पुरग्रस्तांना देण्यात यावे असे पत्र गट शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहे.

तालुक्यासह राज्यात सध्या पावसाने हाहाकार माजवला असुन मागील 20 दिवसांपासून धो धो पाऊस कोसळत आहे.त्यामुळे तालुक्यातील जिवन दायीनी ठरणारी वर्धा, निरगुडा नदी तथा नाल्यांना महापूर येवुन  शेतकरी अस्मानी, व शासनाकडुन मदत जाहीर झाली नसल्याने व फक्त आश्वासीतच केल्याने सुलतानी संकटात सापडला आहे.

शासनाकडुन ठोस मदत मिळेल या आशेवर असणाऱ्या बळीराजाची आर्थिक घुसमट होत असतानांच तालुक्यातील जळका येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मानवतावादी संवेदनशील शिक्षक “सुभाष मोतीराम केराम” यांनी त्यांच्या माहे जुलैच्या वेतनामधुन, शिक्षण विभागाला पत्र देऊन 20 हजार रुपये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात यावे अशी पत्राद्वारे विनंती केली आहे.


विद्यार्थ्यी घडवण्याचे सत्कार्य करत असतानाच पुरग्रस्तांना मदतीचा हात देत समाजासमोर आदर्श  निर्माण करणाऱ्या या शिक्षकांचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here