स्म्शानभूमिला शेड नसल्याने अंत्यविधीची गैरसोय
पावसात ताळपत्रीचा वापर.
दापोरा गावाची विदारक परिस्थिती.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[992286218]
मारेगाव :- जन्मा पासून ते मरना पर्यंत शासनाच्या विविध योजना अस्तित्वात आहे.मात्र यंत्रनेच्या नियोजन शून्य कार्यप्रणालीमुळे नागरिकांना लाभा पासून वंचीत राहावे लागत आहे. मानवाच्या विकासा करिता शासन स्तरावरून विविध योजना राबविल्या जात असताना खैरगांव(बुट्टी)ग्रामपंचायतच्या हद्दीत येत असलेल्या दापोरा या छोट्याशा गावात अजूनही अंत्यविधीसाठी शेडची व्यवस्था करण्यात आली नसल्याने भरपावसात मृतदेहाला अग्नी देताना ताळपत्रीचा वापर करावा लागत आहे.
गेल्या काही दिवसा पासून सततधार पावसाचा कहर सुरु आहे. जन्म आणि मृत्यू दोन्ही घटना नैसर्गिक असल्यामुळे कधीही घडत अशातच मारेगाव तालुक्यातील खैरगांव ग्रामपंचायत च्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या दापोरा या गावात सुभाष जवादे या वृद्धाचा दिनांक 23जुलै ला मृत्यू झाला. सततधार पाऊस थांबण्याची शक्यता नसल्याने नातेवाईकांना पावसात अत्यविधी पार पडावा लागला आहे.
मात्र या गावात स्म्शानभूमीला शेड नसल्यामुळे अत्यविधीला मोठी अडचनीचा सामना करावा लागला आहे. अजूनही काही गावात शेड ची व्यवस्था नसल्याने मृतदेह अर्धवट जळून विटंबणा होत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. मात्र 23तारखेला दापोरा येथील मृतक जवादे याचा पार्थिवास अग्नी देताना चित्ता पावसाने विझू नये यासाठी त्याच्या सरणावर त्याच्या नातेवाईकांनी टाळपत्रिचा तंभु उभारून चिंताग्नी दिला.
शेड अभावी चिता जळणार कशी? असा प्रश्न उभा असताना त्यांनी प्रसंगावधान ओळखून अंत्यविधी पार पडला आहे. त्यामुळे गावा गावात स्म्शानभूमीच्या सौन्दरयीकरणासाठी शासन लाखो रुपयाचा निधी खर्च करीत असताना आमच्या गावाला योजनेचा लाभ का नाही असा संताप जनक प्रश्न दापोरावासी उपस्थित ग्रामस्थ करीत आहे.
दापोरा हे छोटे गाव असल्यामुळे लोकप्रतिनिधीचे या गावाकडे फारसे लक्ष नाही.स्मशानभूमीची मागणी गेल्या अनेक दिवसापासूनची असताना राजकारणाच्या चक्रव्हूवात यापूर्वी च्या कार्यकाळात दुर्लक्ष झाले. आता मात्र स्मशानभूमीला प्राधान्य क्रम असून लवकरच स्मशानभूमी उभारण्यात येईल असे खैरगाव दापोरा गटग्रामपंचायत चे सरपंच रामचंद्र जवादे यांनी सांगितले.