जंगली डुकरांपासुन शेतकऱ्यांवर होणारे हल्ले व पिकांचे नुकसान थांबवण्यासाठी डुकरांना ठार मारण्याची परवानगी द्या राजेश्वर गोंड्रावार
ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी
पांढरकवडा वन विभागा अंतर्गत येणाऱ्या जामणी वनपरीक्षेत्रामध्ये मांडवी,चाटवण,जुनोनी,कारेगाव,पिवरडोल,गवारा तसेच संपूर्ण झरी जामणी तालुका हा आदिवासी बहुल असुन जंगलालगत आहे. सदर जंगलामध्ये सन २०१९ पासून वाघांचे वास्तव्य आहे.त्यावेळी वाघाची संख्या ही नगन्य होती त्यामुळे शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना वाघाचा त्रास कमी होत.
परंतु सन २०२१ मध्ये वाघांची संख्या वाढल्यामुळे शेतकऱ्यांना जास्त त्रास होऊ लागला व त्याच वर्षी दि. ०९/०७/२०२१ रोजी पिवरडोल येथील रहिवाशी अविनाश पवन लेनगुळे यांचेवरती अगदी गावा लगत वाघाने हल्ला करून ठार केले.त्यामुळे ह्य घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही,आज रोजी आपल्या जंगलामध्ये अंदाजे ८ ते १० वाघांची संख्या असल्याचे निदर्शनास आले आहे.
मागील १५ दिवसांपासुन पिवरडोल,मांडवी,चाटवण,गवारा,कारेगाव या शिवारामध्ये वाघांचा मोठ्या प्रमाणात वास्तव्य असल्याचे दिसून आले. दिनांक ०१/०७/२०२४ रोजी जुनोनी शिवारातील शेतकरी अनिल पत्रुजी बाटगुरे व पिवरडोल शिवारातील शेतकरी भारत भूमाजी गुरुनुले यांच्यावर दिनांक ०५/०७/२०२४ रोजी वाघाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता दोनही शेतकरी हे पळ काढून घरी परत आले.

तसेच दिनांक ०८/०७/२०२४ रोजी जुनोनी शिवारातील शेतकरी संतोष निकोडे यांच्या शेतामध्ये डावरन करत असतांना अचानक वाघाने हन्ला करण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर दिनांक १०/०७/२०२४ रोजी चाटवण शिवारातील वामनराव जंगमवार यांच्या शेतामध्ये डांबररोड लगत सलग दोन दिवस रानडुकाराची शिकार करुन वास्तव्यास होता त्यामुळे वरील ४ ही घटनेमुळे परिसरात शेतकरी व शेतमजुरांमध्ये भितीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे शेतांमध्ये शेतीची कामे करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे तसेच वाघाची व रानडुकरांची दहशत असल्यामुळे मजुर शेतामध्ये काम करायला येत नसल्यामुळे शेती पडीत पडण्याची वेळ निर्माण झाली आहे.या सर्व घटनेवरून मनुष्य हानी जीवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे सदर वाघांना जेरबंद करुन नेण्यात यावे तसेच जंगली डुकरांपासुन शेतकऱ्यांवर होणारे हल्ले व शेतातील पिकांचे नुकासन थांबण्यासठी यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यात यावा व रानडुकरांना मारण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी माजी सभापती रागेश्वर गोंड्रॉवार यांनी महाराष्ट्र राज्य वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडे निवेदनद्वारे केली आहे .