यवतमाळ आसान्या फाउंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेऊन वृक्ष लागवड जनजागृती करण्यात आली.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माननीय अमोल रंगारी मुख्य व्यवस्थापक जिल्हा पोस्ट कार्यालय यवतमाळ यांची उपस्थिती लाभली प्रमुख पाहुणे म्हणून माननीय जयाताई महाकाळे कनिष्ठ प्रशासन अधिकारी कृषी विभाग जिल्हा परिषद यवतमाळ तसेच माननीय डॉक्टर स्नेहल दिघाडे माननीय सुनीलभाऊ मालके शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ ,मा. हिरालाल फुलझेले साहेब, मा. डॉ. किशोर बनसोड पशुवैद्यकीय अधिकारी दारव्हा यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली त्यानंतर धम्मचारी हर्ष प्रिय यांच्या वतीने सामूहिक प्रार्थना घेण्यात आली तसेच मान्यवरांचे रोप कुंडी देऊन स्वागत करण्यात आले सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला यामध्ये वंदनाताई उरकुडे बाल संस्कार वर्ग नियमितपणे चालविणे तसेच सामाजिक कार्यासाठी त्यांचा सन्मान आणि पल्लवीताई कांबळे यांचा महिला सशक्ती करणाच्या अनुषंगाने सन्मानशेला आणि पुस्तक भेट मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
सत्कारमूर्तींनी आपल्या कार्याची माहिती आणि अनुभव सांगितले त्यानंतर जया महाकाळे मॅडम यांच्या हस्ते शेतकऱ्यांना फवारणी किटचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अमोल रंगारी यांनी पोस्ट खात्यामार्फत राबविल्या जाणाऱ्या लोकाभिमुख योजनेची माहिती आपल्या भाषणातून सांगितली त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये आसान्या फाउंडेशनच्या वतीने पिंपळ ,कडुलिंब,आवळा,उंबर,जांभूळ, सिताफळ,चिंच या झाडांचे रोपण करण्यात आले.

आणि वृक्ष लागवडीचा संदेश देण्यात आला याप्रसंगी राजेश रंगारी जात पडताळणी कार्यालय अमरावती ,सुनील वानखेडे ,पुरुषोत्तम भजकवरे ,वानखेडे भाऊ, निलेश सुखदेवे नितीन मेश्राम ,मीनाताई रामटेके, वंदनाताई मेश्राम,पुष्पाताई शेळके आणि परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे करण्यासाठी आसान्या फाउंडेशनच्या सक्रिय सदस्या मृणालिनी दहीकर आणि नितीन पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.