ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी,
तालुक्यात वाघाची दहशत अनेक वर्षापासून कायम आहे.काल सायंकाळी साडेचार च्या सुमारास गवाऱ्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील शेत शिवारात लक्ष्मीकांत गुरनुले यांच्या गाईवर वाघाने हल्ला केला. सुदैवाने लक्ष्मीकांत व गाय बचावले. विशेष म्हणजे लक्ष्मीकांत हे आपल्या गाईला शेताकडे चालण्यासाठी घेऊन गेले होते.वाघाने गाईवर ज्यावेळी हल्ला केला त्यावेळी लक्ष्मीकांत हे त्या गाईजवळच होते.त्यांनी आरडा ओरड करून वाघाला हुसकावून लावले.

वाघाने लक्ष्मीकांत यांच्या दिशेनेही हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.मात्र त्यांनीं पुऱ्या ताकती निशी आरडा ओरड करुन,वाघाच्या दिशेने दगड भिरकावल्याने वाघाने तिथून काढता पाय घेतला.यात गाय आणि मालक लक्ष्मीकांत वाचले असले तरी गाईवर पंजाचे आणि दातांचे निशाणी उमटले आहे. गाईच्या मालकाने घटनास्थळावरून गाईला गवारा पिवरडोल मार्गावर आणल्यानंतर गावातील लोकांनी त्या ठिकाणी धाव घेतली.या परिसरामध्ये सतत वाघाचे दर्शन लोकांना होत असल्यामुळे शेतकरी व शेतमजूर वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
सध्या शेतामध्ये कपाशीचे पीक पाच ते सहा फुट उंचीचे झालेले आहे त्यामुळे वाघ कुठेही दवा धरून बसू राहू शकतो.त्यामुळे नको ती घटना घडण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही.अशाच वाघाच्या हल्ल्यात पिवरडोल येथील एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे.या घटनेमुळे या मार्गाने जाणाऱ्या लोकांतही भीतीचे वातावरण आहे.