पांढरकवडा येथील 32 वर्षीय शेतकऱ्याने केली आत्महत्या

0
1199

राहत्या घरी घेतले विष

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील पांढरकवडा येथील शेतकऱ्याने राहत्या घरीच विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.आशिष दिगंबर आस्वले 32 असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो पांढरकवडा येथील राहिवासी होता.

मारेगाव तालुक्यातील पांढरकवडा ( पिसगाव ) येथील आशिषकडे एक हेक्टर शेती आहे.तो या शेतीच्या उत्पन्नावर स्वतःच्या कुटुंबियांची उपजीविका करीत होता.परंतु अनियमित असलेला पाऊस आणि उत्पन्नामध्ये होत असलेला घाटा यामुळे मागील काही दिवसांपासून आशिष हा विमनस्क स्थितीत राहत होता.

अशातच दि. ५ ऑक्टोबरला दुपारी आशिषने आपल्या राहत्या घरी विषारी कीटकनाशक घेतले. विष घेतल्यानंतर त्याने ही माहिती शेतामध्ये असलेल्या आपल्या नातेवाईकांना कळविली. तसेच ही वार्ता गावामध्ये पसरली. गावातील नागरिकांना ही घटना माहिती होताच त्यांनी आशिषला तात्काळ मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु त्याची तब्येत अस्वस्थ वाटू लागल्याने आशिषला वणी येथे रेफर केले. वणी जात असतांनाच आशिषचा वाटेतच मृत्यू झाला. त्याचेमागे आईवडील, पत्नी, एक भाऊ आणि बहीण असा आप्त परिवार आहे.
=======================
६ महिन्या वर्षांपूर्वीच झाला होता आशिषचा विवाह
आशिष आस्वले  याचा विवाह याच वर्षी ६ महिन्यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील मुलीशी झाला होता. अवघ्या ६ महिन्याच्या आतच आशिषच्या पत्नीच्या नशिबी वैधव्य आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here