साहित्य संमेलनाच्या नावाखाली पैशाची उधळपट्टी:प्रागतिक साहित्य पंचायतीचे संमेलन स्थळीच धरणे आंदोलन

राज्य शासनाने शेतकऱ्यांचे दोन कोटी रुपये साहित्य संमेलनाला देऊ नयेत , तसेच या संमेलनाचे अध्यक्ष हे भ्रष्ट व वांग्मय चोरी करणारे आहेत , साहित्य संमेलनाच्या नावाखाली पैशाची उधळपट्टी सुरू आहे म्हणून ती थांबवावी या मागणीसाठी प्रागतिक साहित्य पंचायत महाराष्ट्राच्या वतीने संमेलन स्थळाच्या प्रवेशद्वारासमोरच आज सलग दुसऱ्या दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले मात्र दुपारी दोन नंतर पोलिसांनी त्यांना तिथून उठवले.
99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला हे धंदे आंदोलन दुसऱ्या दिवशीही करण्यात आले.
शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला पैसे नाहीत आणि या साहित्याची जत्रा मराठी भाषेला किती उपयोगी हा खरा प्रश्न आहे म्हणूनच आम्ही हे धरणे आंदोलन करून लक्षवेध करत आहोत असे आंदोलकांच्या वतीने सांगण्यात आले.
आंदोलकांमध्ये आभरान‌कार ‌ पार्थ पोळके , शिवाजी राऊत , गणेश कारंडे , असलम तडसरकर , विजय निकम , सचिन जाधव , अरविंद गाडे हे सहभागी झाले होते.‌

Leave a Comment

error: Content is protected !!