राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्याने केवळ प्रशासकीय भेटींपुरते न राहता मानवी संवेदनशीलतेचा आणि साधेपणाचा वेगळाच संदेश दिला आहे. दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड या आदिवासीबहुल गावात मुक्काम करत त्यांनी गावकऱ्यांशी थेट संवाद साधला. मात्र, या दौऱ्यातील सर्वात भावनिक आणि चर्चेचा विषय ठरलेला प्रसंग म्हणजे एका शेतकरी कुटुंबाच्या साध्या घरात जाऊन त्यांनी केलेले पारंपरिक जेवण. राज्याच्या प्रथम नागरिकाने थेट शेतकऱ्याच्या घरी पाय ठेवत जमिनीवर बसून भोजन केल्याने संपूर्ण गावात आनंद आणि अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. पिंपरखेड गावातील शेतकरी हिरामण शंकर साबळे यांच्या घरी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अचानक भेट दिली. महामहिम येणार असल्याची माहिती मिळताच साबळे कुटुंबाने आपल्या परीने घर सजवण्याचा प्रयत्न केला. साध्या घराची रंगरंगोटी करण्यात आली असून, प्रवेशद्वारावर आकर्षक वारली चित्रकला साकारण्यात आली होती. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारी ही कलाकृती पाहून राज्यपालांनी समाधान व्यक्त केल्याचे सांगितले जाते. राज्यपाल घरात प्रवेश करताच साबळे कुटुंब भारावून गेले, तर आनंदाश्रूंनी वातावरण भरून आले. आयुष्यात पहिल्यांदाच राज्यपाल आपल्या घरात येत असल्याची अनुभूती कुटुंबीयांसाठी अविस्मरणीय ठरली. या भेटीची तयारी केवळ औपचारिक न राहता, ती मनापासून करण्यात आली होती. साबळे कुटुंबातील गोजरताई यांनी पारंपरिक आदिवासी आणि ग्रामीण खाद्यसंस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारी खास मेजवानी तयार केली. कोणतेही शाही पदार्थ नाही, कोणताही दिखावा नाही, तर रोजच्या जगण्यातला साधा पण पोषणमूल्यांनी परिपूर्ण असा जेवणाचा मेनू ठेवण्यात आला होता. लाल व पांढऱ्या नागलीची भाकरी, बाजरीची भाकरी, उडीदाचे वरण, हरभऱ्याची भाजी, अळूची भाजी आणि वर्कण कंदाची भाजी अशा पारंपरिक पदार्थांचा या जेवणात समावेश होता. हा मेनू केवळ पोट भरणारा नव्हे, तर ग्रामीण आणि आदिवासी जीवनशैलीचे प्रतीक ठरला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी या मेजवानीचा आस्वाद घेताना कोणतीही औपचारिकता न ठेवता जमिनीवर बसून कुटुंबीयांसोबत जेवण केले. पंगतीत बसून, साध्या पद्धतीने अन्नग्रहण करत त्यांनी गावकऱ्यांच्या मनात थेट स्थान निर्माण केले. हा क्षण उपस्थितांसाठी अत्यंत भावनिक ठरला. देशातील सर्वोच्च घटनात्मक पदांपैकी एक पद भूषवणारी व्यक्ती अशा साधेपणाने वागताना पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले. राज्यपाल असूनही आमच्यासारखाच जमिनीवर बसून जेवण करतात, अशी भावना अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली. या प्रसंगाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. राज्यपालांच्या साधेपणाचे, माणुसकीचे आणि ग्रामीण संस्कृतीशी असलेल्या नात्याचे कौतुक सर्व स्तरांतून केले जात आहे. राजकीय पदे आणि सत्तेच्या भोवऱ्यात अडकलेल्या काळात अशा प्रकारची भेट जनतेला सकारात्मक संदेश देणारी ठरत असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. विशेषतः शेतकरी आणि आदिवासी समाजाशी थेट संवाद साधत त्यांच्या घरात जाऊन वेळ घालवणे, हे केवळ औपचारिक दौऱ्यापेक्षा वेगळे आणि प्रभावी पाऊल मानले जात आहे. प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न पिंपरखेडमध्ये मुक्कामादरम्यान राज्यपालांनी गावकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, शेतीविषयक प्रश्न आणि ग्रामीण विकासाबाबतच्या अपेक्षा जाणून घेतल्या. केवळ भाषणांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अनुभव घेण्यावर त्यांनी भर दिल्याचे या दौऱ्यातून दिसून आले. शेतकरी कुटुंबाच्या घरात जेवण करून त्यांनी प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. गावकऱ्यांसाठी ही भेट केवळ सन्मानाची नव्हे, तर आत्मीयतेची आणि आपुलकीची ठरली आहे. साधेपणाचा आणि माणुसकीचा संदेश राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या या कृतीमुळे सार्वजनिक पदांवर असलेल्या व्यक्तींनी कसे वागावे, याचे एक वेगळे उदाहरण निर्माण झाले आहे. दिखाव्यापेक्षा साधेपणा, प्रोटोकॉलपेक्षा माणुसकी आणि भाषणांपेक्षा कृती यांचा प्रभाव अधिक असतो, हे या भेटीतून अधोरेखित झाले आहे. पिंपरखेडमधील साबळे कुटुंबासाठी हा दिवस आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला असून, संपूर्ण गाव आजही या भेटीबद्दल अभिमानाने बोलत आहे. राज्यपालांच्या या दौऱ्याने नाशिक जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात साधेपणाचा आणि माणुसकीचा संदेश पोहोचवला आहे.
नागलीची भाकरी, उडीदाचे वरण, हरभरा, अळूची भाजी:राज्यपाल आचार्य देवव्रतांचा पिंपरखेडमध्ये आदर्श दौरा; जमिनीवर बसून जेवण
-
By सुरेश पाचभाई
- January 2, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
हिंगोली शहर स्वच्छतेसाठी पालिकेचे पाऊल:७०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे...
5views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 11, 2026
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी कारवाई:18 महिन्यांनंतर...
5views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 11, 2026
बांगलादेशी तरुणीने प्रेमासाठी ओलांडली सीमा:जळगावात दुसरी ‘सीमा...
6views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 11, 2026
