Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

कुणी मदत देता का मदत,अपंग पती-पत्नीचा आर्त टाहो

सुरेश पाचभाई मारेगाव,

पती जन्मापासून अपंग,पत्नी ही शारीरिक अपंग,दोघांनाही जगण्यासाठी साधन नाही,दोघांकडूनही मजुरीचे काम होत नाही,अशा अवस्थेत जगायचे कसे? असा प्रश्न या दाम्पत्यांपुढे निर्माण झाल्यामुळे यांच्या संसाराची वाताहत तर होणार नाही ना अशी अवस्था निर्माण झालेली आहे.

अशा अवस्थेत या अपंगांनी कोणी मदत देता का मदत असा आर्त टाहो फोडला.यांची परिस्थिती पाहून ह्रदय हेलावून टाकल्याशिवाय राहत नाही.ही कहाणी आहे मारेगाव तालुक्यातील खंडणी गट ग्रामपंचायत मध्ये येत असलेल्या भुरकी पोड येथील.गुणवंत रामदास मडावी हा 26 वर्षीय युवक जन्मापासून अपंग आहे. त्याचे वडील तो लहान असताना त्यांना सोडून गेले. त्याचे आईने त्याचा कसाबसा सांभाळ केला.


त्याला शिक्षणासाठी बोटोनी येथील आश्रम शाळेमध्ये टाकले आणि त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.अपंग मुलाचे जीवन असेच जाईल असे वाटत असतानाच रा.पांढरकवडा, तालुका केळापूर येथील  एका मुलीचा गुणवंताला निरोप आला. 2022 मध्ये पौर्णिमा हीचेशी गुणवंताचे चंद्रपूर येथे लग्न आटोपले.परंतु पौर्णिमा ही सुद्धा उंचीने फक्त तीन फुटाचीच.त्यामुळे एक अस्थिविंग तर दुसरी शारीरिक अपंग अशी जोडी जुळून आली.

पत्नी ग्रॅज्युएट आहेत पण तिचा संसारात काही उपयोग होत नव्हता. म्हणून दोघांनी भुरकी पोड येथे पान टपरी चे दुकान थाटले.दुकान छोटेसे गाव छोटासा त्याच्यामुळे आज दुकानांमधून त्यांना खूप असा प्रॉफिट मिळत नव्हता. कधी कधी खर्च सुद्धा बरोबर निघत नव्हता म्हणून ते दुकान त्यांनी बंद केले. दोघांच्याने मजुरीचे काम होत नसल्याने आता जगायचे कसे असा यक्षप्रश्न या दोन्ही अपंगां पुढे आहेत.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!