अजित पवार हे महाराष्ट्राचे लोकनेते होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता. अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या निधनावर भावना व्यक्त केल्या आहेत. ज्याच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड आस्था होती. अजित दादा हे अतिशय संघर्षातून तयार झालेले अशा प्रकारचे नेतृत्व होते. कोणत्याही परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणारे व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्राकरता आजचा दिवस अतिशय कठीण दिवस आहे. अशा प्रकारचे नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्षे लागतात, असे देखील फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान अजित पवार देत होते. अशा काळामध्ये त्यांचे निघून जाणे हे अविश्वसनीय आहे. मनाला चटका लावणारे आहे. वैक्तिगत माझ्याकरता एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र मला सोडून गेलेला आहे. त्यांच्या कुटुंबावर देखील हा प्रचंड मोठा आघात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही सर्व लवकरच बारामतीकडे रवाना होत आहे. सकाळपासूनच मी सर्वांच्या संपर्कात आहे. माननीय प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री सर्वांशी चर्चा करून त्यांनाही घडलेल्या सर्व परिस्थितीची कल्पना दिलेली आहे. त्यांनी याबद्दल प्रचंड दुःख व्यक्त केलेले आहे. राज्यात तीन दिवसाचा दुखावटा जाहीर संपूर्ण देशातच या सर्व प्रकरणामुळे हळहळ पसरली आहे. अजित पवार यांच्या कुटुंबाशी चर्चा करून पुढच्या सर्व गोष्टी ठरविण्यात येतील. सकाळी सुप्रिया सुळे यांच्याशी बोलणं झालं आहे. तसेच पार्थ पवार यांच्याशी देखील चर्चा झाली आहे. संपूर्ण पवार कुटुंब बारामतीला पोहोचल्यानंतर त्यांच्या संमतीने पुढचे निर्णय घेतले जातील. बारामती मध्ये शासकीय सुट्टी घोषित करण्यात आली आहे. तसेच राज्यात तीन दिवसाचा दुखावटा जाहीर करण्यात आलेला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विश्वास ठेवायलाच मन तयारच नाही कधीही भरून न निघणारे नुकसान महाराष्ट्राचे झाले आहे. अशा प्रकारचे लोकनेते गेल्यानंतर जी पोकळी निर्माण होते, ती भरुण काढणे कठीण आहे. अतिशय संघर्षाच्या काळात आम्ही सोबत काम केलेले आहे. या गोष्टीवर विश्वास ठेवायलाच मन तयारच होत नसल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
दमदार आणि दिलदार मित्र मला सोडून गेला:CM देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केल्या भावना; राज्यात तीन दिवसाचा दुखावटा जाहीर
-
By सुरेश पाचभाई
- January 28, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
जुन्या काळातील ‘आटाचक्की’ ठरली गावाच्या संस्कृतीची साक्षीदार
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 8, 2026
इम्तियाज जलील यांच्याकडून निदा खानची पाठराखण:पोलिसांना सहकार्य...
5views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 8, 2026
सरकारला शेतकऱ्यांबद्दल आस्था उरली नाही का?:भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी...
6views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 8, 2026
चंद्रपूर हादरले!:निराधार गतिमंद महिलेवर नराधमाचा अत्याचार; पीडिता...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 8, 2026
हिंगोली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८३ टक्के:मागील वर्षीच्या...
5views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 8, 2026
