ब्रेकिंग न्यूज
News 18 Marathi Headlines | 21 Aug | 9 AM | Kurla-Trombay Railway News | Auto Taxi Fare Price News सोशल मीडियावर फोटो पाहिला, गायिकेला फोन केला, जेवायला बोलावलं अन्…, कोल्हापूरच्या तरुणाचं भयंकर कांड Virender Sehwag Son : जसा बाप तसा बेटा! सेहवागच्या लेकाचा धमाका, सेम टू सेम कव्हर ड्राईव्ह; 157 च्या स्ट्रा… मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील गोसाई विठुजी कापसे यांचे निधन Jalgaon Crime News | नशिराबादमध्ये पोलिसाच्या घरात सशस्त्र दरोडा | Police Naik Ganesh Koli कमी खर्चात शेतीतून मिळेल भरघोस उत्पन्न, जमिनीच आरोग्य जपण्यासाठी 3 गोष्टी कराच, Video अवघ्या 5 वर्षांची चिमुकली, स्वातंत्र्यदिन कार्यक्रमावरून घरी आली, रिक्षावाल्यानं चॉकलेट दिलं अन्… भयंकर क… Eknath Shinde: कुणबी जात प्रमाणपत्राचा शिंदे गटाला फटका! जातप्रमाणपत्र बोगस आढळल्यानं नगरसेविकेची निवड रद… मारेगावात महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लग्नानंतर सगळं सुरुळीत होतं, पण पतीची भयंकर डिमांड, विवाहितेनं…, छ. संभाजीनगर हादरलं!
SP News Maregaon

मुळा धरणातील बोट नादुरुस्त, तीन गावांचा राहुरीशी संपर्क तुटला:९० लाख रुपयांचा निधी मंजूर होऊनही ५ वर्षांत बोट मिळेना‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी | राहुरी मुळा धरणाच्या जलाशयातून तीन गावांना जोडणारी बारागांव नांदूर धक्का ते जांभळी धक्का दरम्यान चालणारी प्रवासी यांत्रिक बोट नादुरुस्त झाली आहे. यामुळे गेल्या चार दिवसांपासून धरणाच्या पलीकडील वावरथ, जांभळी आणि जांभुळबन या तीन गावांमधील ग्रामस्थांचा राहुरी तालुक्याशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे. मागील चार दिवसांपूर्वी या यांत्रिक बोटीचा गिअर बॉक्स तुटल्याने ही सेवा ठप्प झाली असून, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थांना जलकोंडीचा सामना करावा लागत आहे. राहुरी तालुक्यातील वावरथ, जांभळी आणि जांभुळबन ही तीन गावे मुळा धरणाच्या पाण्याने तीन बाजूंनी वेढलेली आहेत. येथील नागरिकांना धरणाच्या अथांग पाण्यातून प्रवासी बोटीने प्रवास करूनच बारागांव नांदूर मार्गे तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. जांभळीवरून यांत्रिक बोटीने प्रवास केल्यास राहुरी अवघ्या १६ किलोमीटर अंतरावर आहे. आता बोट बंद असल्याने रस्ता मार्गे यायचे असल्यास ढवळपुरी-अहिल्यानगर मार्गे तब्बल १०० किलोमीटर, किंवा वनकुटे, चास, आग्रेवाडी मार्गे ८० किलोमीटरचा द्राविडी प्राणायाम करावा लागत आहे. यामुळे वेळ आणि प्रवास खर्च तिप्पट वाढला आहे. या बोटीतून दररोज ३०० ते ४०० नागरिक प्रवास करत होते. मात्र, आता ज्यांना राहुरीला जाणे अत्यंत गरजेचे आहे, असे अवघे ३० ते ४० नागरिक मासेमारी करणाऱ्या खासगी छोट्या होडीतून जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. अथांग पाण्यात लहान होडी उलटल्यास जबाबदार कोण? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा करून जिल्हा नियोजनातून ९० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी आणली होती. ‘महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड’च्या मापदंडानुसार बोटीचा आराखडा तयार करून ठेकेदाराला ६ महिन्यांची मुदत दिली होती. मात्र, राज्यात सरकार बदलले आणि संबंधित ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ दिली गेली. ती नवीन बोट आजतागायत मुळा धरणात पोहोचू शकलेली नाही. वावरथ, जांभळी, जांभुळबन गावांना शासकीय कामे, आजारपण, बँक, शिक्षण आणि शेतमाल वाहतुकीसाठी याच बोटीवर अवलंबून राहावे लागते. सध्याची बोट अत्यंत जुनी आणि कालबाह्य झाली आहे. तिची तातडीने दुरुस्ती व्हावी आणि नवीन बोट मिळावी, अशी मागणी महिला संघर्ष समिती अध्यक्ष वर्षा बाचकर यांनी केली. जुनी बोट आता चालवण्यालायक नाही ^ माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या पाठपुराव्यातून नवीन बोटीसाठी जिल्हा परिषदेतर्फे ९० लाखांचा निधी मंजूर झाला होता. परंतु, दुर्दैवाने मागील ५ वर्षांत या नवीन बोटीचे अवघे ६० टक्केच काम झाले आहे. जुनी बोट आता चालवण्यालायक राहिलेली नाही. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आता या गंभीर विषयात स्वतः लक्ष घालून नवीन यांत्रिक बोट उपलब्ध करून द्यावी. -रामदास बाचकर, उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, राहुरी.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर