ब्रेकिंग न्यूज
पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…
SP News Maregaon

राज्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी:चंद्रपूर, नाशिकसह जळगाव-बीडमध्ये वादळी वाऱ्यासह सरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


गेल्या अनेक दिवसांपासून प्रखर उष्णता आणि उकाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रातील जनतेला अखेर मान्सूनपूर्व पावसाने मोठा दिलासा दिला आहे. रविवारी सायंकाळी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि गारांच्या पावसाने हजेरी लावली. चंद्रपूर, नाशिक, जळगाव आणि बीड जिल्ह्यांत झालेल्या या पावसामुळे तापमानात घट होऊन सर्वत्र गारवा निर्माण झाला आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून तीव्र उष्णतेच्या लाटेने होरपळणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याला रविवारी पावसाने चिंब भिजवले. दिवसभराच्या कडक उन्हानंतर संध्याकाळी अचानक सोसाट्याचा वारा सुटला आणि हलक्या पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास झालेल्या या पावसामुळे वातावरणातील उष्णता कमी झाली असून, उन्हाच्या काहिलीपासून नागरिकांना सुटका मिळाली आहे. नाशिक आणि जळगावमध्ये शेतीच्या कामांना वेग नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, मनमाड आणि ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पाऊस झाला. यामुळे मशागतीच्या कामांना आता वेग येणार आहे. जळगावमधील चाळीसगाव आणि भडगाव तालुक्यातही सायंकाळी काळे ढग दाटून आले आणि जोरदार पाऊस बरसला. अनेक दिवसांच्या उकाड्यानंतर झालेल्या या पावसाचे नागरिकांनी स्वागत केले असून, शेतजमिनीत ओलावा निर्माण झाल्याने बळीराजा सुखावला आहे. बीडमध्ये पावसाचा तडाखा; घरांवरील पत्रे उडाले बीड जिल्ह्याच्या लिंबागणेश परिसरात सायंकाळी वादळी वाऱ्यासह दमदार पावसाने हजेरी लावली. मात्र, या वादळाचा फटका मसेवाडी येथील शेतकऱ्यांना बसला आहे. जोराच्या वाऱ्यामुळे काही शेतकऱ्यांच्या घरांवरील पत्रे उडून गेले असून, ऐन पावसाळ्यात कुटुंब उघड्यावर आल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जिल्ह्यात अजूनही काही ठिकाणी हलक्या सरी कोसळत असून वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे. मशागतीच्या कामांना गती मान्सूनपूर्व पावसाच्या या आगमनामुळे आगामी खरीप हंगामासाठी शेतजमिनी तयार करण्याच्या कामांना आता मोठी गती मिळणार आहे. पावसाने जमिनी ओलावल्याने शेतकरी आता मशागतीची उर्वरित कामे पूर्ण करण्याच्या तयारीत आहेत. मान्सून अद्याप केरळातच; पेरणीबाबत खबरदारी दरम्यान, मान्सूनच्या आगमनाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातील बहुतांश भागात किमान १० जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, आगामी काळात होणारा वादळी पाऊस हा मान्सूनचा पाऊस नाही. मान्सून अद्याप केरळमध्ये पोहोचलेला नसल्यामुळे महाराष्ट्रात त्याचे आगमन लांबणीवर पडले आहे. या पार्श्वभूमीवर, कृषी विभागाने शेतकऱ्यांना अत्यंत मोलाचा सल्ला दिला आहे. मान्सूनपूर्व पडणाऱ्या वादळी पावसावर अवलंबून राहून शेतकऱ्यांनी पेरणीची अजिबात घाई करू नये. पुरेशा पावसाअभावी पेरणी केल्यास बियाणे वाया जाण्याची भीती असल्याने, मान्सूनचे अधिकृत आगमन आणि जमिनीतील ओलावा पाहूनच पेरणीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर