पार्थ पवारांना मुख्यमंत्र्यांचे कवच:मराठी शाळा बंद पडतायत? मग आत्मचिंतन करा, भारत माता विकणे ही गुलामी नाही का?- संजय राऊत

मराठी शाळा का बंद पडत आहेत याचे आत्मचिंतन मराठी समाजाने केले पाहिजे. आम्ही आपले मुले मराठी शाळेत का घालत नाही, मराठी शाळेत न टाकता इंग्रजी शाळेत मुले टाकण्यावर आपला भर दिसून येतो आहे, काही जणांची मुले परदेशात शिकण्यासाठी जात आहेत, मराठी शाळा बंद पडण्यामागे कोणते सरकार किंवा शिक्षणमंत्री जबाबदार नाही तर मराठी माणूसही तितकाच जबाबदार आहे, असे असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात कायद्यापुढे सर्व जण समान नाहीत हे सिद्ध होत आहे. पार्थ पवार यांच्या पाठिशी मुख्यमंत्री असल्याने त्यांना काही त्रास होत नाही. अशा प्रकरणात विरोधकांचे नाव आले असते तर हे प्रकरण खूप पुढे गेले असते, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर VSR कंपनीच्या विमानाला उड्डानबंदी करण्यात आली हा रोहित पवारांचा विजय आहे. ते यापुढेही लढाई लढतील. मोदींनी देश विकला संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी देश अदानींना विकला असून उरलेला देश आता अमेरिकेला विकला आहे. राहुल गांधी सत्य बोलत आहे, उद्योगपती मित्रांसाठी आणि काही फाईल्स थांबवण्यासाठी भारत मातेला विकले. देश विकणे म्हणजे गुलामी नाही का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. एकत्रित बसून चर्चा करू संजय राऊत म्हणाले की, राज्यसभेची एक जागा जर मविआला मिळणार असेल तर ती काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षांना एकत्र बसून निर्णय घ्यावे लागतील ना मग त्यामध्ये बातमी असे काही नाही. विधान परिषदेची एक आणि राज्यसभेची एक जागा आहे त्यासाठी एकत्रित बसून निर्णय घेतल्याशिवाय कोणतीही निवडणूक पुढे जाणार नाही. त्यादृष्टीने आमदारांची बैठक घेणे, नेत्यांची बैठक या गोष्टी आल्या. या निवडणुकीची तयारी देशभरात सुरू आहे. 36 जागा रिकाम्या होत आहे, यात महाराष्ट्रातील 7 जागा आहेत. महायुतीकडे 6 जागा निवडून आणण्याइतके बळ आहे. एका जागेवर आम्ही सर्व जण मिळून निर्णय घेणार आहोत. मविआमध्ये चर्चा होईल संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षाचे सदस्य निवृत्त होत आहेत. रजनी पाटील, शरद पवार, फौजिया खान, प्रियांका चतुर्वेदी सदस्य निवृत्त होत आहे, त्यामुळे प्रत्येक पक्ष आपला उमेदवार पुन्हा निवडून जावा यासाठी मत व्यक्त करत आहे. पण जागा एक असल्याने कोण निवडून जाणार यावर 3 पक्षांमध्ये चर्चा होणार आहे. शरद पवार निवडणुकीला उभे राहणार आहेत त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. त्यांच्या उमेदवारीवर मविआमध्ये चर्चा होईल त्यानंतर आम्ही पुढे जावू. ..तो राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न संजय राऊत म्हणाले की, मविआमध्ये काही मतभेद नाहीत, आम्ही मविआ म्हणून एकत्र आहोत. विधीमंडळाच्या पायऱ्यावर झालेल्या आंदोलनात आमचे आमदार आहेत काही जणांना पोहचण्यासाठी वेळ झाला असेल. अजित पवार यांच्या पक्षाचे नेतृत्व कुणी करावे हे त्यांनी ठरवावे. त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष कोण होणार हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पार्थ पवार यांच्या पाठिशी मुख्यमंत्री असल्याने जमीन घोटाळा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण हे प्रकरण काही दबणार नाही. विरोधकांचे नेते किंवा त्यांचे कुटुंबिय यामध्ये असते त्यात तथ्य जर नसते तरीही हे प्रकरण खूप पुढे गेले असते.

Leave a Comment

error: Content is protected !!