ब्रेकिंग न्यूज
Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा …
SP News Maregaon

मंत्र्यांना घोडेबाजारात रस, शेतकऱ्यांसाठी वेळ नाही:केळी उत्पादकांच्या कोट्यवधींच्या नुकसानीवरून एकनाथ खडसेंची टीका

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्याच्या काही भागांत नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे शेतीचे आणि विशेषतः केळी उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे अतोनात नुकसान झाले असून, याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. जळगाव जिल्ह्यातून तब्बल चार मंत्री राज्य मंत्रिमंडळात असतानाही, केवळ रक्षा खडसे यांचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही मंत्र्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली नाही, असा गंभीर आरोप खडसे यांनी केला आहे. एकनाथ खडसे म्हणाले, या मंत्र्यांना विधान परिषदेच्या घोडेबाजार करण्यात रस जास्त आहे. मात्र शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, माझेही नुकसान झाले आहे. जिल्ह्यात मंत्री असूनही त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली नाही. वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके भुईसपाट झाली आहेत. विक्रीसाठी तयार झालेला माल या वादळी वाऱ्याने आणि पावसामुळे मातीमोल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सलग तीन दिवस जळगाव जिल्ह्यात वादळी पाऊस सलग तीन दिवस कोसळलेल्या वादळी पावसाने जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. रावेर, यावल, जळगाव, चोपडा आणि मुक्ताईनगर या तालुक्यांमध्ये जोरदार वाऱ्यांसह आलेल्या वादळाने केळीच्या बागा मोठ्या प्रमाणात जमीनदोस्त झाल्या आहेत. रावेर तालुक्याला सर्वाधिक फटका बसला असून निरुळ, पाडळे खुर्द, पाडळे बुद्रूक, अटवाडे, खिर्डी, ऐनपूर, रसलपूर या गावांसह मुक्ताईनगर तालुक्यातील तापीकाठच्या परिसरातील बागाही भुईसपाट झाल्या आहेत. जळगाव तालुक्यातील फुपनगरी, वडनगरी, खेडी खुर्द आणि आव्हाणे, चोपडा तालुक्यातील गोरगावले, माचले, मंगरूळ, वर्डी, खर्डी, पंचक व धानोरा तसेच यावल तालुक्यातील किनगाव, मनवेल, न्हावी आणि थोरगव्हाण या परिसरांनाही वादळाचा जबर तडाखा बसला आहे. पाच तालुक्यांमध्ये मिळून सुमारे पाच हजार हेक्टर केळी पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला असून बाधित शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर