ब्रेकिंग न्यूज
Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा …
SP News Maregaon

आमचा खासदार पळालाय, सापडला तर सोडू नका:तो भाऊसाहेब नव्हे, ‘खाऊसाहेब’; शिर्डीत उद्धव ठाकरेंचा वाकचौरेंवर कडाडून हल्ला

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांमध्ये झंझावाती दौरे करत आहेत. या मोहिमेत आज त्यांनी शिर्डीचे आराध्य दैवत साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले आणि त्यानंतर आयोजित जाहीर सभेतून शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर शब्दांचे तीक्ष्ण बाण सोडले. “काहींच्या नसानसात आणि रक्तातच गद्दारी भिनलेली असते, त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भाऊसाहेब. हा भाऊसाहेब नव्हे, तर ‘खाऊसाहेब’ वाकचौरे आहे. जिथे जाईल तिथे फक्त ‘खाऊ’ खायचा, हाच यांचा एककलमी कार्यक्रम आहे,” अशी घणाघाती टीका ठाकरेंनी केली. सभेच्या सुरुवातीलाच मैदानावर घडलेल्या एका गमतीशीर प्रसंगाचा धागा पकडत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना जोरदार टोला लगावला. ते म्हणाले, “मी भाषणाला उभा राहण्यापूर्वी इथे एक अनाऊन्समेंट झाली की, कोणाच्या तरी गाडीची चावी हरवली आहे, ती सापडल्यास आणून द्यावी. मलाही तुम्हाला एक तशीच महत्त्वाची सूचना करायची आहे; आपला इथला खासदार पळाला आहे! तो जर तुम्हाला कुठे सापडला, तर त्याला सोडू नका आणि अजिबात परत आणू नका. आता या जगात नक्की विश्वास तरी कोणावर ठेवायचा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.” वाकचौरेंचे पलायन हाच ‘शुभशकुन’; सरकार पडणार! खासदार वाकचौरे यांच्या बंडखोरीवर बोलताना ठाकरेंनी २०१४ मधील एका राजकीय योगायोगाची आठवण करून दिली. “सभेला येण्यापूर्वी मला काही स्थानिक लोक भेटले. ते म्हणाले की, साहेब या गद्दाराचे जाणे हा आपल्यासाठी शुभशकुन आहे. २००९ मध्ये आपण याला हक्काने निवडून दिले, पण २०१४ ला हा पळून गेला. हा पळाला आणि राज्यात आपले सरकार आले! यंदाही इतिहास पुनरावृत्त होणार आहे. या गद्दारांच्या पापाचा घडा भरला असून हे विद्यमान सरकार पडल्याशिवाय राहणार नाही,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. पवित्र शिर्डीत ‘श्रद्धा-सबुरी’ हवी, यांना तर रोज नवीन बाप लागतो शिर्डीच्या पावन भूमीचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी गद्दारांच्या नैतिकतेवर बोट ठेवले. ते म्हणाले, “ही पवित्र शिर्डी नगरी आहे, जिथे साईबाबांच्या ‘श्रद्धा आणि सबुरी’ला सर्वोच्च स्थान आहे. माणसाची कुठेतरी निष्ठा असावी लागते. आपली निष्ठा साईबाबांवर, जनतेच्या कामावर आणि भगव्या झेंड्यावर आहे. पण या गद्दारांची कशावरच श्रद्धा नाही आणि सबुरीचा तर पत्ताच नाही. यांना रोज नवीन बाप लागतो! जरा संयम ठेवला असता, तर उद्या येणारं सरकार आपलंच आहे. देवानेच उद्याच्या स्वच्छ सरकारमध्ये हे भ्रष्ट विचारांचे लोक नकोत म्हणून त्यांना ही दुर्बुद्धी दिली असावी, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं.” फडणवीसांना राज्यात गुंतवून ठेवण्याची शहा सेनेला सुपारी उद्धव ठाकरे म्हणाले की, “त्या शहा सेनेच्या प्रमुखाला, गद्दाराला सुपारी दिली आहे. याला (देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून) गुंतवून ठेवा इथे. मी मंदिरात जाऊन आल्यानंतर “काय प्रार्थना केली? काय प्रार्थना केली?” विचारत होते. मी म्हटलं, “मी प्रार्थना हीच केली की या देशावर आणि या राज्यावर जे संकट आलं आहे, हे संकट, हे अरिष्ट लवकर दूर कर. ही सगळी भ्रष्ट राजवट लवकरात लवकर गाडून टाक आणि पुन्हा एकदा माझ्या देशाला सुजलाम-सुफलाम आणि चांगले दिवस येवो, ही मी साई चरणी प्रार्थना केलेली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या खुर्चीचं रक्षण कर असेही बोललो.” शिवसेनेला नव्हे, भाजपला पुनर्बांधणीची गरज उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेला पुनर्बांधणीची गरज नाही. भाजपला गरज आहे. आम्ही २५ ते ३० वर्ष त्यांच्यासोबत होतो. देशाला मानतो तो मुस्लिम आपला आहे. हे आमचं हिंदुत्व भाजपला जोपर्यंत मान्य होतं, तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत होतो. आज भाजपमध्ये उपरे आहेत. त्यामुळे त्यांना पुनर्बांधणीची गरज आहे. यांना उपऱ्यांची गरज आहे. यांच्या पक्षाची बांधणी उपऱ्यांवर झाली. आज आमचा खासदार पळवला. उद्या दुसरा निवडून आणू. किती पळवून न्याल’. तुमच्या संतापाला वाचा का फुटत नाही? उद्धव ठाकरे म्हणाले, “राज्यात आणि देशात नेभळट कारभार सुरू आहे. फोडाफोडी सुरू आहे. नीटचा पेपर फुटला. तुमचीही मुले नीटला असतील. त्यांच्या अपेक्षाचे काय? शेतकऱ्याकडे बैल नाही. पण हे नालायक, नीच लोकं खासदार फोडायला लागले आहेत. बातमी आल्यावर बैल दिला. बैल कशाला दिला. एखादा खासदार द्यायचा. मंत्री द्यायचा ना. माजलेले आहेत ते. बैल दिला तोही नांगराच्या भाराने बसला. बैलाला नांगराचा भार पेलवत नाही. पण शहा सेनेलाला पैशाचा भार पेलवत नाही. कालपर्यंत टीईटीचा पेपर फुटला. तुमच्या संतापाला वाचा का फुटत नाही? हा प्रश्न विचारायला आलो आहे.” उद्धव ठाकरे म्हणाले, “फोडाफोडीचे राजकारण केवळ शिवसेना फोडण्यापर्यंत नाही. हा योगायोग नाही. राज्यात शिवसेना फोडली. तृणमूल काँग्रेस फोडली. आम आदमी पक्ष फोडला. हे कारस्थान हुकूमशाहीसाठी चालू आहे. ते निवडणुकीत अब की बार ४०० पार का करत होते? खरंतर त्यांना संविधान बदलायचे होते.” शेळीसारखं १०० दिवस जगण्यापेक्षा… या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. तसेच शिवसैनिकांमध्ये नवा उत्साह भरताना त्यांनी शेवटी “१०० दिवस शेळीसारखे लाचार होऊन जगण्यापेक्षा, १ दिवस वाघासारखे डौलात आणि हिमतीने जगलेले कधीही चांगले!” असे म्हणत त्यांनी आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले. हे ही वाचा… फडणवीसांना PM पदासाठी पाठिंबा देणार का?:उद्धव ठाकरे म्हणाले- गद्दार सोडून मराठी माणूस पंतप्रधान व्हावा, पण RSS चा पाठिंबा असूनही फडणवीसांच्या करिअरची काळजी वाटते
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख यांनी नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटण्याचे काम सुरू असल्याचे म्हटले होते. आज शिर्डीत पत्रकारांनी त्यांना फडणवीस पंतप्रधान होणार असतील तर त्यांना पाठिंबा देणार का? असे विचारले असता ते म्हणाले, आधी फडणवीसांनी जाहीर करावे की, ते पंतप्रधान पदाची तयारी करत आहेत. पण त्यांनी आपली भूमिका मांडल्यास ते पक्षात राहतील का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. सोबतच गद्दार सोडून मराठी माणूस पंतप्रधान व्हावा. देवेंद्र फडणवीस यांना संघाचा पाठिंबा आहे. मात्र, त्यांच्या करिअरची आपल्याला चिंता वाटते, अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली. सविस्तर वाचा…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर