सोलापूर जिल्ह्यातून इतिहासकार आणि पुरातत्व विभागाला अचंबित करणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. बोरामणीच्या माळरानावर तब्बल १५ घेरे असलेला एक विशालकाय ‘चक्रव्यूह’ सापडला आहे. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह असल्याचे मानले जात असून, या शोधाने प्राचीन भारत आणि रोम यांच्यातील व्यापारी संबंधांवर नव्याने प्रकाश टाकला आहे. सर्वात विशेष बाब म्हणजे, या ऐतिहासिक रचनेचा शोध कोणत्याही नियोजित उत्खननादरम्यान लागलेला नाही, तर तो एका वन्यजीव निरीक्षण मोहिमेदरम्यान लागला. ‘नेचर कंजर्वेशन सर्कल’ (Nature Conservation Circle) या संस्थेची टीम बोरामणी वनक्षेत्रात दुर्मिळ सोनचिरैया (माळढोक) पक्षी आणि लांडग्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होती. यावेळी टीममधील सदस्य पप्पू जमादार, नितीन अनवेकर, धनंजय काकडे, भरत छेडा, आदित्य झिंगाडे आणि सचिन सावंत यांना दगडांची एक विशिष्ट रचना दिसून आली. त्यांनी तात्काळ याची माहिती पुरातत्वशास्त्रज्ञ सचिन पाटील यांना दिली आणि या महान शोधाचा उलगडा झाला. काय आहे या ‘चक्रव्यूहा’चे वैशिष्ट्य? पुण्यातील प्रसिद्ध डेक्कन कॉलेजच्या तज्ज्ञांनी या स्थळाचा सखोल अभ्यास केला असून, त्यांनी काही धक्कादायक निष्कर्ष मांडले आहेत. भारतात सहसा कमी घेरे असलेले चक्रव्यूह आढळतात, मात्र १५ घेरे असलेली एवढी विशाल रचना पहिल्यांदाच सापडली आहे. तज्ज्ञांच्या मते, ही रचना इसवी सन पहिल्या ते तिसऱ्या शतकादरम्यानची, म्हणजेच सुमारे २००० वर्षे जुनी आहे. हा चक्रव्यूह लहान दगडांच्या तुकड्यांनी बनलेला असून तो जमिनीपासून १ ते १.५ इंच उंच मातीच्या थरावर उभारला आहे. बाहेरून केंद्राकडे जाण्यासाठी यात एक निश्चित मार्ग आहे. चक्रव्यूहाची रचना त्या काळातील ‘रोमन क्रेट’ नाण्यांवर आढळणाऱ्या चिन्हांशी तंतोतंत जुळते. व्यापारासाठी ‘नेव्हिगेशनल मार्कर’? हा केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक भाग नसून त्याचा वापर दिशादर्शनासाठी केला जात असावा, असा अंदाज पुरातत्व तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्या काळी सोलापूर हे जागतिक व्यापाराचे एक प्रमुख केंद्र होते. रोमन व्यापारी या खुणेचा वापर ‘नेव्हिगेशनल मार्कर’ म्हणजेच मार्ग ओळखण्यासाठी करत असावेत. पहिल्या ते तिसऱ्या शतकात भारतातून मसाले, रेशीम आणि नीळ रोममध्ये पाठवली जात असे, तर बदल्यात सोने आणि मौल्यवान खडे भारतात येत असत. बोरामणीचा हा भाग त्याच ऐतिहासिक व्यापारी मार्गाचा महत्त्वाचा टप्पा असावा. इतिहासातील नवे पर्व या शोधामुळे भारताच्या गौरवशाली इतिहासात एका नव्या अध्यायाची भर पडली आहे. हजारो वर्षांपूर्वी भारताची व्यापारी व्यवस्था किती प्रगत होती आणि जागतिक स्तरावर (Global Trade Route) तिचे स्थान किती महत्त्वाचे होते, हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सोलापूरच्या माळरानावर सापडलेला हा चक्रव्यूह प्राचीन इंजिनिअरिंग आणि भूगोलाच्या समजतेचे एक उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे. सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अर्थ स्थानिक भाषेत या चक्रव्यूहांना ‘कोडे’ म्हटले जाते. विविध संस्कृतींमध्ये त्यांना चक्रव्यूह, मनचक्र, यमद्वार अशी नावे आहेत. नेव्हिगेशनशिवाय या रचना ध्यान, मातृसत्ताक प्रजनन शक्ती आणि आध्यात्मिक साधनेशी जोडल्या गेल्याचेही अभ्यासक सांगतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल लंडनस्थित प्रसिद्ध चक्रव्यूह संशोधक जेफ सावर्ड यांनी या शोधाला अत्यंत महत्त्वपूर्ण ठरवले आहे. हा शोध यूकेमधील ‘कॅरड्रोइया’ या आंतरराष्ट्रीय जर्नलच्या 2026 च्या आवृत्तीत सविस्तर प्रसिद्ध केला जाणार आहे.
सोलापूरच्या माळरानावर सापडला सर्वात मोठा दगडी ‘चक्रव्यूह’!:15 घेरे, 2 हजार वर्षे जुना इतिहास; रोमशी असलेले ‘कनेक्शन’ उघड
-
By सुरेश पाचभाई
- December 20, 2025
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
महापुरुषांच्या विचारानेच समाजाची प्रगती शक्य – व्याख्याते...
4views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 20, 2026
स्कायलार्क इंग्लिश मीडियम स्कूल करंजी येथे शिवजयंती...
9views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 20, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे जाळ्यात?:ऐपत प्रमाणपत्रासाठी...
8views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 20, 2026
भिवंडीच्या महापौरपदी नारायण चौधरी:काँग्रेसने भाजपला धक्का देत...
8views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 20, 2026
