सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगरपंचायतीच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचा उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आला आहे. या ठिकाणी भाजपने शेकापशी युती करून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. पण अखेर मतदारांनी शिवसेनेला कौल देऊन आपला निकाल स्पष्ट केला आहे. सांगोला नगरपंचायतीची निवडणूक राज्यभरात चांगलीच गाजली होती. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील विरुद्ध भाजप – शेकाप व माजी आमदार दीपक साळुंखे युती असा दुरंगी सामना झाला होता. भाजपच मंत्री जयकुमार गोरे यांनी या ठिकाणी शिंदे गटाची कोंडी करत शहाजीबापूंना एकटे पाडण्याचा प्रयत्न केला. स्वतः शहाजीबापूंनीही ही गोष्ट जाहीरपणे बोलून दाखवली होती. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात त्यांच्या प्रचार कार्यालयावरही छापेमारी करण्यात आली होती. यामुळे ते अधिकच चिडले होते. त्यांनी त्याचे जोरदार भांडवल केले. अखेर आज झालेल्या मतमोजणीत त्यांच्या शिवसेनेला चांगल्या जागा मिळाल्या. शिवसेनेचे 23 पैकी 15 उमेदवार विजयी सांगोला नगरपंचायतीच्या निवडणुकीत आज झालेल्या मतमोजणीत शिवसेनेचे 23 पैकी 15 उमेदवार विजयी झालेत. याशिवाय नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदा माने यांनीही विजय मिळवला आहे. दुसरीकडे, शेकापचे 3, भाजपचे 4 व दीपक साळुंखे यांच्या गटाचा 1 उमेदवार विजयी झाला आहे. शहाजीबापूंनी या विजयावर आनंद व्यक्त करत सांगोल्याचा मतदार स्वाभिमानाने वागल्याची प्रतिक्रिया दिली आहे. शहाजीबापूंनी निकालावर व्यक्त केला आनंद शहाजीबापू म्हणाले, सांगोला शहरातील मतदारांचा मला गर्व व अभिमान वाटत आहे. सांगोला तालुक्याची वैचारिक बांधणी मी व स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी केली. विरोधकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत केलेली युती सांगोल्याच्या मतदारांना आवडली नाही हे निकालावरून दिसून येते. सांगोल्यात सर्वच पक्ष विरोधात होते. पण शिवसेना व रिपब्लिकन पक्षाची युती झाली होती. राजकारणात सध्या सुरू असलेले वेडेवाकडे वागणे सांगल्याच्या जनतेने अमान्य केले. त्यांनी शिवसेनेला भरघोस मतदान केले. नगरपालिका निवडणुकीत मला एकटे पाडण्यात आले. पण मला जनतेने साथ दिल्याचे निकालातून स्पष्ट होते. आपल्यासोबत सर्वसामान्य जनता असल्याची बाब मला प्रचारावेळी जाणवले होते. त्यामुळे आमचे उमेदवार सर्वाधिक मतांनी विजयी झाले. भाजपने शिवसेनेला विश्वासात घेऊन नगरपालिकेची निवडणूक लढवण्याची गरज होती. कारण, सोलापूर जिल्ह्यात शिवसेना कधीच चुकीचे वागचली नव्हती. शिवसेना भाजपच्या खांद्याला खांदा लावून काम करत होती. पण आम्हाला विचारात न घेता भाजपने ही निवडणूक लढवली. त्यामुळे त्यांना जिल्ह्यात धक्का बसला, असे पाटील म्हणाले. जनतेला कुटील कारस्थानांना मान्यता देत नाही आज निकाल ऐकताना एवढेच वाटते की, राजकारणात खूप कुटील कारस्थाने केली जातात. पण जनता त्याला मान्यता देत नाही. एकनाथ शिंदेंनी या शहराच्या विकासासाठी तब्बल 200 कोटींचा निधी दिला. त्यामुळे पुढील कालखंडात आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार सांगोल्याचा चेहरामोहरा बदलून टाकू, अशी भावनाही शहाजी बापू पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. उल्लेखनीय बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभाही सांगोल्यात झाल्या होत्या. त्यात आरोप – प्रत्यारोप जोरदार झाले होते. सुरुवातीला भाजप व शेकापची बाजू मजबूत दिसत होती. पण प्रत्यक्ष प्रचारात शहाजीबापू पाटील यांनी आघाडी घेतली होती.
सांगोल्यात शहाजी बापूंचे एकदम ओक्के!:सत्ताधारी शिवसेनेचे 15 उमेदवार विजयी, नगराध्यक्षपदही खिशात; भाजप – शेकापची दाणादाण
-
By सुरेश पाचभाई
- December 21, 2025
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
भोंदू खरातचा कोठडीतला मुक्काम वाढला:पाचव्या गुन्ह्यात 5...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 19, 2026
नाशिक TCS प्रकरणातील पीडितेची आपबीती:म्हणाली – आरोपीने...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 19, 2026
विरोधकांच्या ताकदीपुढे मोदी सरकार अक्षरशः थंड पडले:भाजपची...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 19, 2026
