शहरासाठी केवळ ५५ दिवसांत २०१९ मध्ये १६८० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. निविदा प्रक्रिया अंतिम होऊन कार्यारंभ आदेशही मिळाले होते. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टक्केवारीसाठी फाइल मातोश्रीवर अडीच वर्षे प्रलंबित ठेवली. पाणीपुरवठा विभाग, पालकमंत्री ते मातोश्री अशी फाइल फिरत राहिली. अडीच वर्षे पाणीपुरवठा योजनेचे काम प्रलंबित राहिल्याने शहराला पाणी मिळू शकले नाही, असा आरोप राज्याचे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केला. भाजप-शिवसेना युतीचे सरकार २०२२ मध्ये आल्यानंतर नव्याने पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती मिळाली. केंद्राचा एक हजार कोटींचा हिस्सा प्राप्त झाल्याने आता २७४० कोटींवर योजना गेल्याचे सावे यांनी स्पष्ट केले. शहराला तीन महिन्यांत पाणी मिळणार असल्याचा पुनरुच्चारही केला. ‘दिव्य मराठी’च्या वतीने आयोजित “नेताजी इन न्यूजरूम’ कार्यक्रमात अतुल सावे यांनी शनिवारी (१० जानेवारी) हजेरी लावली. विधानसभा निवडणूक २०१९ नंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांनी शहराच्या पाणीपुरवठा योजनेची वर्कऑर्डर थांबवली. संपलेली पाणीपुरवठा योजना फडणवीस यांनी पुन्हा सरकार आल्यानंतर नव्याने बैठक घेत युद्धपातळीवर सुरू केली. आता योजनेचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. ३७०० हॉर्स पॉवरची चाचणी यशस्वी झाली. शहराच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे सावे यांनी स्पष्ट केले. शहरासाठी ६५० कोटींचे रस्ते, २३० कोटी कचरा नियोजन आणि २७४० कोटी पाण्यासाठी प्राप्त झाले.
शहराच्या पाणी योजनेची फाइल 2.5 वर्षे कमिशनसाठी मातोश्रीवर- सावे:उद्धव ठाकरेंमुळे शहराला विलंबाने पाणी मिळत असल्याचा आरोप
-
By सुरेश पाचभाई
- January 11, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
LPGचे उत्पादन 11 हजार मेट्रीक टनापर्यंत वाढवले:केरोसीन...
6views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 16, 2026
तारकेश्वर गडाचे महंत अदिनाथ महाराजांवर शस्त्रक्रिया यशस्वी:म्हणाले-...
6views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 16, 2026
बायपास शस्त्रक्रियेसाठी राज्यात एकही पैसा खर्च नाही:राज्यातील...
7views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 16, 2026
धर्मस्वातंत्र्य विधेयकात कोणत्याही धर्मावर अन्याय नाही:विरोधकांकडून मतांच्या...
4views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 16, 2026
घरगुती गॅससाठी आता ‘ई-केवायसी’ अनिवार्य:दुर्लक्ष केल्यास कनेक्शन...
6views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 16, 2026
स्वयंसेवी वैद्यकीय सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी सीएमई क्रेडिट...
4views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 16, 2026
