ब्रेकिंग न्यूज
Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात…
SP News Maregaon

‘जागतिक कंपन्या इतर राज्यांकडे, महाराष्ट्राचे काय?’:कागदी करार नको, प्रत्यक्ष गुंतवणूक हवी, गुंतवणुकीच्या मुद्द्यावर रोहित पवारांचा सरकारला टोला

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे आज मोठ्या शिष्टमंडळासह स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या ‘जागतिक आर्थिक परिषदेसाठी’ रवाना होत आहेत. 19 ते 23 जानेवारीदरम्यान होणाऱ्या या पाच दिवसीय दौऱ्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. मात्र, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून सरकारवर टीका करत गुंतवणुकीच्या मुद्द्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये जागतिक कंपन्या महाराष्ट्राऐवजी इतर राज्यांना पसंती देत असल्याची उदाहरणे दिली आहेत. मनोरंजन क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘डिस्ने’ आणि सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील ‘हनीवेल’ यांनी विस्तारासाठी बंगळुरूची निवड केल्याचे त्यांनी नमूद केले. डिस्नेने बंगळुरूमध्ये 1.74 लाख चौरस फूट, तर हनीवेलने 4 लाख चौरस फूट जागा भाड्याने घेतली आहे. तसेच, डेलॉइटने मंगळुरूमध्ये 50 हजार नोकऱ्यांची घोषणा केली असून, मारुती सुझुकीने 35 हजार कोटींची गुंतवणूक करून गुजरातमध्ये नवीन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. देशाचे आर्थिक इंजिन असलेल्या महाराष्ट्राला जागतिक कंपन्यांची गुंतवणूक का मिळत नाही, असा थेट सवाल करत रोहित पवार यांनी सरकारच्या गुंतवणूक धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दावोस दौऱ्यात मुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांनी प्रत्यक्ष गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासाठी ठोस प्रयत्न करावेत आणि राज्यातील बेरोजगार तरुणांना खऱ्या अर्थाने दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. केवळ कागदावरचे सामंजस्य करार न करता प्रत्यक्ष उद्योग उभे राहावेत, असा सूचक टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची बाजू मांडताना मागील वर्षीच्या दावोस दौऱ्याचे यश अधोरेखित केले आहे. गेल्या वेळी झालेल्या सामंजस्य करारांपैकी सुमारे 72 टक्के करार प्रत्यक्षात उतरल्याचा दावा त्यांनी केला आहे. मागील वर्षी 16 लाख कोटी रुपयांचे करार झाले होते आणि यंदाही तितकीच गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर