Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

अजित पवार चटका लावून गेले!:दादांशिवाय महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण बेचव आणि आळणी; वाचा मान्यवरांनी जागवलेल्या आठवणी

बारामतीत आज सकाळी झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. ज्यामुळे संपूर्ण राज्य हादरले आहे. त्यांच्या अकाली निधनावर सर्व राजकीय नेत्यांनी शोक आणि संवेदना व्यक्त केल्या आहेत. मोठा भाऊ गेल्याची भावना आहे… डोंगराएवढं दु:ख झालं, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. ही बातमी ऐकून आपण हादरलो असून, महाराष्ट्राने एक अनुभवी आणि कणखर नेता गमावला आहे, अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली. राजकारणापलीकडची मैत्री जपणारा नेता हरपला – शंभूराज देसाई अजित पवारांच्या अपघाती निधनाची बातमी अत्यंत दुःखद- पृथ्वीराज चव्हाण धाडसी निर्णय घेणारा नेत हरपला- मनोज जरांगे अजित पवारांच्या निधनावर कार्यकर्त्याची भावनिक प्रतिक्रिया एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले दु:ख कालची भेट ही दादांची व माझी काळाने ठरवलेली शेवटची भेट- संजय केनेकर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र स्तब्ध झाले आहे, अशी भावना संजय केनेकर यांनी व्यक्त केली. “कालची भेट ही दादांची आणि माझी शेवटची भेट ठरेल, याची कल्पनाही नव्हती,” असे ते म्हणाले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधी मिळावा अशी मागणी त्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली होती, ज्यावर अजितदादांनी सकारात्मक आश्वासन दिले होते. प्रशासकीय शिस्त, कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणे आणि विकासाची दूरदृष्टी असलेला ‘कार्यसम्राट लोकनेता’ हरपल्याचे सांगत, संजय केनेकर यांनी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. दादांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी- नितेश राणे महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला- राज ठाकरे अजित दादा गेल्याचा विश्वासच बसत नाही; महाराष्ट्राचे राजकारण स्तब्ध — संजय शिरसाट दमदार आणि दिलदार मित्र मला सोडून गेला,देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केल्या भावना अजित पवारांच्या निधनाने रितेश देशमुख भावूक, ‘भरून न निघणारी पोकळी’ दादांचा रुबाबदार, प्रेमळ स्वभाव आवडायचा- आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक असल्याची भावना आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. “शब्दच नाहीत,” असे सांगत त्यांनी अजित दादांसोबत पहिल्या सरकारमध्ये तसेच काही काळ विरोधी पक्षात काम करण्याचा अनुभव आठवला. विधिमंडळाच्या कारभारावर असलेली त्यांची रुबाबदार पकड आणि प्रेमळ स्वभाव अनेकांना भावायचा, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी अजित दादांना आणि दुर्घटनेतील त्यांच्या सहकाऱ्यांना विनम्र श्रद्धांजली वाहिली. निर्भीडपणाची ओळख असलेला नेता गेला- अंबादास दानवे राज्यात शासकीय सुटी, तीन दिवसांचा दुखवटा जाहीर ही अत्यंत धक्कादायक बातमी- इम्तियाज जलील आज पुन्हा पोरका झालो – धनंजय मुंडे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली- रावसाहेब दानवे राजकारणातला खरा दादा हरपल्याची भावना- राजू पाटील महाराष्ट्राच्या राजकारणातला खरा दादा हरपल्याची भावना व्यक्त करत मनसे नेते राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाच्या वृत्तावर तीव्र शोक व्यक्त केला. “ही बातमी ऐकून मोठा धक्का बसला आहे,” असे ते म्हणाले. प्रशासनावर वचक असलेले, स्पष्टवक्तेपणा आणि तत्काळ निर्णयक्षमता असलेले धडाडीचे लोकनेते म्हणून अजितदादांची ओळख जनमानसात कायम राहील, असे सांगत राजू पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. अजितदादा, तुमचा राजकीय प्रवास नेहमीच सगळ्यांसाठी प्रेरणादायी राहील- चंद्रकांत पाटील दिलदार नेता महाराष्ट्राने गमावला- निलेश राणे हे ऐकून डोकं पूर्णपणे सुन्न झाले.. विश्वासच बसत नाही- अंजली दमानिया भाजप नेते विनोद तावडेंनी व्यक्त केले दु:ख बारामतीच्या मातीतील एक झंझावात आज त्याच मातीत शांत झाल्याची भावना व्यक्त करत भाजप नेते विनोद तावडे यांनी मा. अजितदादा यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला. “या बातमीवर विश्वास ठेवणं अशक्य आहे. अजितदादांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला चटका बसला आहे,” असे ते म्हणाले. राजकारणात खड्या शब्दात भूमिका मांडणारे, जनतेत रमणारे आणि शब्दाला जागणारे लोकनेते आज हरपल्याची भावना त्यांनी व्यक्त करत, “दादा, महाराष्ट्र तुम्हाला कधीही विसरणार नाही,” अशा शब्दांत श्रद्धांजली वाहिली. सुप्रिया सुळेंकडून एका शब्दांत भावना व्यक्त अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी कळताच, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सॲपवर ‘ Devasted’ म्हणजे उद्धवस्त असे एका शब्दाचे स्टेटस ठेवून भावना व्यक्त केल्या. लोकनेत्याला गमावले विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘अजित दादा हे राजकारणात शब्द पाळणारे कुशल प्रशासक होते. जे होणार नाही ते स्पष्ट सांगणार. जे होणार ते काम करणार असे स्पष्टवक्ता नेता होते. मी ज्यावेळी मंत्रिमंडळात पहिल्यांदा आलो तेव्हा मी त्यांचा राज्यमंत्री होतो. त्यांनी मला विभागाचे कामकाज कसे वागायचे याचे धडे दिले. त्यांच्याबरोबर कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले. २५ वर्ष त्यांच्याबरोबर काम केले. आज महाराष्ट्राच्या मातीतला मोठा नेता गमावला आहे. कल्पनेच्या पलीकडचे हे घडले आहे. एका लोकनेत्याला महाराष्ट्राने गमावले आहे.’ अजितदादांशिवाय महाराष्ट्र बेचव, आळणी “आज महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील काळा दिवस आहे. अजित पवार यांच्यासारखा कार्यक्षम आणि रोखठोक नेता आपल्यातून निघून गेला आहे. त्यांच्याशिवाय महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण आता ‘बेचव’ आणि ‘आळणी’ होईल. त्यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न अधुरेच राहिले,” अशा अत्यंत भावूक शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. संजय राऊत म्हणाले, आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबईतून बारामतीला घेऊन जाणाऱ्या विमानाच्या अपघाताची बातमी कळली, तेव्हा आम्ही सगळे प्रार्थना करत होतो की अशी कोणत्याही प्रकारची बातमी कानावर येऊ नये आणि अजित पवार सहीसलामत अपघातातून बाहेर यावेत. पण दुर्दैवाने धक्कादायक आणि दु:खद बातमी आमच्या कानावर आली. अजित पवार यांच्याशिवाय महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण बेचव आणि आळणी होईल. त्यांचे व्यक्तिमत्व दिलखुलास, रोखठोक, कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणारा नेता असे होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!