Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

आपबिती… पाणी पिण्यासाठी बाहेर आले म्हणून माझा जीव वाचला:निष्पाप कामगारांचा बळी सुरक्षा मानके पाळली नसल्यानेच स्फोट

कमी पगार आणि सुरक्षेचा अभाव अशा दुहेरी संकटात काम करणाऱ्या ग्रामीण महिलांच्या आयुष्याचा खेळ मांडणाऱ्या स्फोटक कंपनीत भीषण दुर्घटना घडली. राऊळगाव, डोर्ली आणि वलनी परिसरातील महिला जेथे अवघ्या १३ ते २० हजार रुपयांसाठी मृत्यूच्या छायेत काम करतात तिथे झालेल्या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला आहे. “पाणी पिण्यासाठी बाहेर आले म्हणून जीव वाचला,” अशा शब्दांत रोशनी मसरामने आपली आपबीती सांगितली, मात्र त्यांच्यासोबतच्या अनेक मैत्रिणींना या मृत्यूने कवटाळले. संरक्षणतज्ज्ञांच्या मते, जिलेटीन आणि डिटोनेटर्स हाताळताना आवश्यक असलेली ‘वाळूची पोती’ आणि इतर सुरक्षा मानके पाळली नसल्यानेच हा स्फोट झाला असावा. धक्कादायक बाब म्हणजे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी वारंवार सेफ्टी ऑडिटची मागणी करूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला. कंपनी म्हणते, उत्पादन कार्य सुरू नव्हतेच ही घटना घडली त्या पॅकिंग युनिटमध्ये त्या वेळी कोणतेही सक्रिय उत्पादन कार्य सुरू नव्हते. नेमके कारण अद्याप तपासाधीन आहे. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहोत असे कंपनीने म्हटले आहे. सेफ्टी ऑडिटकडे दुर्लक्ष केल्याने अपघात- देशमुख सर्वच स्फोटके कंपनीचे सेफ्टी ऑडिट करण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री, पेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षा संघटना व संबंधित विभागाकडे पत्र लिहून केली होती. परंतु याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. तीस वर्षांत असे कधी पाहिले नाही – मंदा कोटरंगे मंदा कोटरंगे या आॅरेंज सिटी हाॅस्पिटलमध्ये आया म्हणून काम करतात, तर दिनेश शेंडे हे मदतनीस आहेत. कोटरंगे गेल्या ३० वर्षांपासून येथे काम करतात. आम्ही नेहमी परमाणे कामावर होतो. सकाळी ८.१५ च्या सुमारास सूचना मिळाली. आणि ८.३० वाजेच्या सुमारास रुग्णवाहिकेतून रुग्ण येणे सुरू झाले. त्यांचे हाल पाहवत नव्हते. गेल्या ३० वर्षांत इतकी भयानक घटना पाहिली नाही. रुग्णवाहिकेतून स्ट्रेचरवर घेऊन नेण्याची हिंमत होत नसल्याचे त्या म्हणाल्या. नवीन कामगारांना केवळ साडेतेरा हजार रुपये वेतन या धोकादायक कंपनीत काम करणाऱ्या कामगार महिला परिसरातीलच राऊळगाव, डोर्ली, मेटपांजरा, वलनी, काटोल देशमुख या गावातील आहेत. येथे नवीन कामगारांना साडेतेरा हजार पगार मिळतो, तर जुन्या कामगारांना १७ ते २० हजारांपर्यंत वेतन मिळते. मात्र कंपनीकडून त्यांच्या सुरक्षेकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. व्यवस्थापन कारणीभूत सेफ्टीसाठी कामगार जिलेटीन तयार करण्यासाठी खाली बसल्यानंतर त्याच्या उंचीएवढी रेतीने भरलेली पाेती त्याच्या मागे ठेवावी लागतात. तिथे वाळू पोेती ठेवलेली नव्हती. यात व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा दिसून येतो. -अभय पटवर्धन, निवृत्त कर्नल संरक्षणतज्ज्ञ एका युनिटमध्ये असतात साधारणपणे ३० कामगार एका युनिटमध्ये साधारणपणे ३० कामगार असतात. त्यापैकी २० मशीनवर आणि १० डिटोनेटर्सच्या काउंटिंगसाठी असतात. घटनेच्या वेळी रोशनी मसराम या पाणी पिण्यासाठी बाहेर आल्या होत्या म्हणून वाचल्या. त्यांच्यासोबत दररोज येणे-जाणे करणाऱ्या वर्षा टेकाम या मात्र मृत्युमुखी पडल्याचा मानसिक धक्का त्यांना बसला. आत नेमके काय झाले हे सांगू शकत नाही.
स्फोटानंतर कंपनीत मोठ्या प्रमाणात आगीचा भडका उडाला. यात अनेक जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!