ब्रेकिंग न्यूज
महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम
SP News Maregaon

मराठवाड्यात 63 गावांची मदार टँकरवर‎:154 विहिरींचे अधिग्रहण संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक 45 गावांमध्ये टंचाई‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


यंदा मराठवाड्यात पावसाने ‎चांगली हजेरी लावली होती. मात्र,‎कडक उन्हाळ्यामुळे पाण्याचे ‎स्रोत वेगाने आटू लागले आहेत. ‎परिणामी, मराठवाड्याच्या बहुतांश‎ भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र‎होऊ लागल्या अाहेत.‎ प्रशासनाकडे पिण्याच्या‎ पाण्यासाठी टँकर्सची मागणी ‎वाढली आहे. सद्यःस्थितीत बीड‎आणि धाराशिव हे दोन जिल्हे‎ वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये टँकर‎ सुरू केले आहेत. विभागीय‎ आयुक्तालयाच्या २९ एप्रिलच्या‎ अहवालानुसार, मराठवाड्यातील‎ छत्रपती संभाजीनगर, जालना‎ आणि लातूर या तीन जिल्ह्यांतील‎ तहानलेली ६३ गावे आणि २६‎वाड्यांना पाणी पुरवठा‎ करण्यासाठी १०६ टँकर्स धावत‎ आहेत. यात ४ शासकीय तर १०२‎ खासगी टँकर्सचा समावेश आहे.‎ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात‎टंचाईची झळ सर्वाधिक असून,‎४५ गावे आणि १२ वाड्यांसाठी‎तब्बल ७३ टँकर्स सुरू आहेत.‎जालना जिल्ह्यातील १६ गावे आणि‎१३ वाड्यांची तहान भागवण्यासाठी‎३१ टँकर्स (२ शासकीय व २९‎खासगी) धावत आहेत. लातूर‎जिल्ह्यातील २ गावे आणि १‎वाडीसाठी २ शासकीय टँकर्स सुरू‎आहेत. मराठवाड्यातील अन्य‎जिल्हे सध्या टँकरमुक्त आहेत.‎ गतवर्षीच्या तुलनेत यंदा टँकर निम्मे मागील वर्षी (२०२५‎मध्ये) मार्च महिना संपण्यापूर्वीच अनेक भागांत टँकर सुरू करावे लागले‎होते. २० ते २२ एप्रिल २०२५ दरम्यान छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड‎आणि लातूर या चार जिल्ह्यांतील १४२ गावे व २४ वाड्यांना तब्बल २१५‎टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. सुदैवाने, यंदा चांगल्या पावसामुळे‎गतवर्षीच्या तुलनेत टँकर्सची संख्या निम्म्याहून कमी (१०६) आहे.‎ बीड, धाराशिवला यंदा‎ टंचाईतून मिळाला दिलासा‎ संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता आणि टँकर‎भरण्यासाठी लागणारे पाणी लक्षात घेऊन‎प्रशासनाने मराठवाड्यातील बीड आणि‎धाराशिव वगळता इतर सर्व जिल्ह्यांतील‎खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यास सुरुवात‎केली आहे. आतापर्यंत एकूण १५४ खासगी‎विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर