Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

मराठवाड्यात 63 गावांची मदार टँकरवर‎:154 विहिरींचे अधिग्रहण संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक 45 गावांमध्ये टंचाई‎

यंदा मराठवाड्यात पावसाने ‎चांगली हजेरी लावली होती. मात्र,‎कडक उन्हाळ्यामुळे पाण्याचे ‎स्रोत वेगाने आटू लागले आहेत. ‎परिणामी, मराठवाड्याच्या बहुतांश‎ भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र‎होऊ लागल्या अाहेत.‎ प्रशासनाकडे पिण्याच्या‎ पाण्यासाठी टँकर्सची मागणी ‎वाढली आहे. सद्यःस्थितीत बीड‎आणि धाराशिव हे दोन जिल्हे‎ वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये टँकर‎ सुरू केले आहेत. विभागीय‎ आयुक्तालयाच्या २९ एप्रिलच्या‎ अहवालानुसार, मराठवाड्यातील‎ छत्रपती संभाजीनगर, जालना‎ आणि लातूर या तीन जिल्ह्यांतील‎ तहानलेली ६३ गावे आणि २६‎वाड्यांना पाणी पुरवठा‎ करण्यासाठी १०६ टँकर्स धावत‎ आहेत. यात ४ शासकीय तर १०२‎ खासगी टँकर्सचा समावेश आहे.‎ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात‎टंचाईची झळ सर्वाधिक असून,‎४५ गावे आणि १२ वाड्यांसाठी‎तब्बल ७३ टँकर्स सुरू आहेत.‎जालना जिल्ह्यातील १६ गावे आणि‎१३ वाड्यांची तहान भागवण्यासाठी‎३१ टँकर्स (२ शासकीय व २९‎खासगी) धावत आहेत. लातूर‎जिल्ह्यातील २ गावे आणि १‎वाडीसाठी २ शासकीय टँकर्स सुरू‎आहेत. मराठवाड्यातील अन्य‎जिल्हे सध्या टँकरमुक्त आहेत.‎ गतवर्षीच्या तुलनेत यंदा टँकर निम्मे मागील वर्षी (२०२५‎मध्ये) मार्च महिना संपण्यापूर्वीच अनेक भागांत टँकर सुरू करावे लागले‎होते. २० ते २२ एप्रिल २०२५ दरम्यान छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड‎आणि लातूर या चार जिल्ह्यांतील १४२ गावे व २४ वाड्यांना तब्बल २१५‎टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. सुदैवाने, यंदा चांगल्या पावसामुळे‎गतवर्षीच्या तुलनेत टँकर्सची संख्या निम्म्याहून कमी (१०६) आहे.‎ बीड, धाराशिवला यंदा‎ टंचाईतून मिळाला दिलासा‎ संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता आणि टँकर‎भरण्यासाठी लागणारे पाणी लक्षात घेऊन‎प्रशासनाने मराठवाड्यातील बीड आणि‎धाराशिव वगळता इतर सर्व जिल्ह्यांतील‎खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यास सुरुवात‎केली आहे. आतापर्यंत एकूण १५४ खासगी‎विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.‎

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!