शेतकरी, मजूर, दिव्यांगांसाठी आम्ही शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार आहोत, अशी भूमिका बच्चू कडू यांनी आज सकाळीच माध्यमांशी बोलताना जाहीर केली होती. आमचे सगळे मुद्दे शिवसेनेने स्वीकारले आहेत. आमचे सगळे मुद्दे मान्य झाल्यानंतरच धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेत आहोत, असे बच्चू कडू यांनी म्हटले. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्याकडून शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरला जाण्याची शक्यता असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. गेल्या दोन दिवसांपासून बच्चू कडू शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. आता त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. नेमके काय म्हणाले बच्चू कडू? बच्चू कडू म्हणाले, आम्ही शिवसेनेचा धनुष्यबाण शेतकरी, मजूर, दिव्यांगांसाठी हाती घेणार आहोत. काल परवा ज्या चर्चा झाल्या, आमचे सगळे मुद्दे शिवसेनेने स्वीकारले आहेत. पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे एमआरजीएसमध्ये घ्यावे, हमीभावात सुधारणा करण्यासाठी लढण्याची गरज आहे. लाडक्या बहिणींमधील विधवा बहिणी तशाच कोरड्या आहेत. शिंदे साहेबांनी दिव्यांगांचे मंत्रालय स्थापन केले, मात्र त्याचे बळकटीकरण झाले नाही. हे सगळे मुद्दे मान्य झाल्यानंतरच धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेत आहे, अशी घोषणा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली आहे. कोणताही समझोता नाही शिवसेनेची राजकीय ताकद मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करू. पण त्याबदल्यात आम्हाला शेतकऱ्याची, दिव्यांगांची ताकद हवी आहे. त्याबद्दल कुठलीही तडजोड होणार नाही, असेही बच्चू कडू यांनी ठामपणे सांगितले. शिंदे साहेबांच्या नेतृत्वात दिव्यांग मंत्रालय उभे राहिले असेल, तर त्याच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न झाला पाहिजे. शेतकऱ्याच्या लढाईत एक इंचही फरक पडणार नाही. प्रहार सामाजिक संघटना आणि प्रहार दिव्यांग संघटना काय राहणार. मात्र पूर्ण ताकदीने शिवसेना कशी वाढेल? त्यासाठी माझ्या अंगातील रक्ताचा प्रत्येक थेंब जितका पक्षासाठी धावणारा आहे, तितकाच माझ्या मजूर, शेतकरी आणि दिव्यांगांसाठी धावणार आहे. त्यांच्यासाठी कोणताही समझोता होऊ शकत नाही, असेही बच्चू कडू यांनी निक्षूण सांगितले. पुन्हा एकदा ‘घरवापसी’ आम्ही आमच्या राजकीय प्रवासाची शिवसेनेतून सुरुवात केली होती. माझ्या अजूनही बाळासाहेब ठाकरेंना शेतकरी कर्जमाफी संदर्भात लिहिलेले पत्र आहे. कापासाच्या भावासंदर्भात आम्ही राजीनामा दिला होता. आता पुन्हा शेतकऱ्यांचे आणि दिव्यांगांचे मुद्दे घेऊन आम्ही शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेत आहोत. हा धनुष्यबाण माझ्या शेतकरी, मजूर, वंचित घटकांच्या, दिव्यांगांसाठी कसा कामी येईल? तो उचलण्याचा प्रयत्न करू, असे बच्चू कडू म्हणाले. मला मंत्रिपद हवे असते तर… बच्चू कडू म्हणाले की, मला मंत्रीपदाचे काही नाही, मला काही मागायची सवय नाही, मला मंत्रीपद हवे असवे तर गुवाहाटीला गेलो होतो, तेव्हाच मागितले असते. लोक मंत्रीपदासाठी फिंल्डींग लावत होती, पण मी दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत होतो, हाच फरक आहे बच्चू कडूचा हे समजून घ्या. बच्चू कडू म्हणाले, आता जे घडतंय ते माझ्या ध्यानीमनी देखील नव्हते, मला काहीच माहिती नव्हती, मी संत्र्याला पाणी देत होतो, तुमच्या बातम्या आल्या सुत्रांनी सांगितले. फोन केला हे केले, इथपर्यंत मी येण्याचे श्रेय मी माध्यमांना देतो, विधान परिषद माझ्या कानावर देखील नव्हती, हे कानावर टाकण्याचे काम माध्यमांनी केले. सामाजिक काम करणाऱ्यांसाठी प्रहार राहील बच्चू कडू म्हणाले की, २४ तासात एकनाश शिंदेंसोबत शेतकऱ्यांच्या हमीभावावर चर्चा झाली, पेरणीपासून ते कापणीपर्यंची चर्चा झाली, दिव्यांगाच्या, आदिवासींच्या संदर्भात चर्चा झाली, त्यांनी सहमती दर्शवली, ज्यासाठी आम्ही मंत्री होतो, आमदार होतो, ज्यासाठी आम्ही आहे, ते होत असेल तर काय? संघटना या काळात चालवणे फार कठिण आहे, कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम करणे माझे काम आहे. जन्म शिवसेनेचा आणि शेवटही शिवसेनेत व्हावा. प्रहार संघटना राहील, ज्याला सामाजिक काम करायचे आहे, त्यासाठी प्रहार राहील. ‘रॉबिनहूड’नेता म्हणून ओळख बच्चू कडू यांनी दिव्यांग, शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा ‘रॉबिनहूड’नेता म्हणून वेगळी ओळख आहे. त्यांच्या ‘प्रहार’ संघटनेकडून नेहमी सामाजिक कार्य सुरू असते. अमरावती जिल्ह्यातला अचलपूल विधानसभा मतदार संघ त्यांचे कार्यक्षेत्र म्हणून ओळखला जातो. त्यांचे पूर्ण नाव ओमप्रकाश बाबाराव कडू असून अमरावती जिल्ह्यातल्या बेलोरा गावात एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. दिव्यांग, अंध आणि अपंगांसाठी त्यांनी केलेले काम आणि वेगवेगळ्या धाटणीचे आंदोलने कायम चर्चेत असतात. त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये काही काळ राज्यमंत्री म्हणून काम केले. त्यांच्या इरसाल आणि ओघवत्या शैलीतल्या भाषणांना उत्तम प्रतिसाद मिळतो.
बच्चू कडू शिवसेनाचा धनुष्यबाण हाती घेणार:म्हणाले- ‘प्रहार’ कायम राहणार; रक्ताचा प्रत्येक थेंब जितका पक्षासाठी तितकाच दिव्यांग, शेतकऱ्यांसाठी धावणार
-
By सुरेश पाचभाई
- April 30, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
विधान परिषद निवडणूक:अखेर काँग्रेसचा दानवेंना पाठिंबा, मविआकडून...
0views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 30, 2026
मराठवाड्यात 63 गावांची मदार टँकरवर:154 विहिरींचे अधिग्रहण...
0views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 30, 2026
10 वर्षांच्या नियमामुळे जिल्हा बँकेच्या रिंगणातून दिग्गज...
0views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 30, 2026
सिंहस्थातील पारंपरिक स्तंभ हाेणार ‘अमृतमंथन’ध्वजस्तंभ:नाशकात रामकुंडावर 51,...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 30, 2026
राहुरी, बारामतीत महायुतीचा ‘एकतर्फी’ करिश्मा:अक्षय कर्डिले अन्...
0views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 29, 2026
माणमध्ये टंचाईच्या बैठकीत ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा:CEO नागराजन...
0views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 29, 2026
