Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

10 वर्षांच्या नियमामुळे जिल्हा बँकेच्या रिंगणातून दिग्गज बाहेर‎:खासदार भुमरे, माजी मंत्री सत्तार, नितीन पाटील यांना संधी नाही, मुले-पत्नी मैदानात‎

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी ‎बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. केंद्र‎सरकारच्या नवीन बँकिंग सुधारणा अधिनियम‎२०२५ मुळे जिल्ह्यातील प्रस्थापित राजकारण्यांना‎मोठा धक्का बसला आहे. सलग १० वर्षे संचालक‎पदावर राहिलेल्या नेत्यांना आता निवडणूक‎लढवता येणार नसल्याने या दिग्गजांनी आपल्या‎कुटुंबातील वारसदारांना रिंगणात उतरवण्याची‎तयारी पूर्ण केली आहे.‎

बँकिंग क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी केंद्राने‎सलग २ कार्यकाळ (१० वर्षे) संचालक‎राहिलेल्यांना निवडणूक लढवण्यास बंदी घातली‎आहे. यामुळे खासदार संदिपान भुमरे, आमदार‎अब्दुल सत्तार, काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण पाटील‎डोणगावकर, माजी अध्यक्ष नितीन पाटील, जावेद ‎‎पटेल आणि मंदा अण्णासाहेब माने आदी मातब्बर ‎‎नेत्यांना या वेळेस निवडणुकीपासून वंचित राहावे ‎‎लागणार आहे. दहा वर्षांच्या नियमामुळे मी स्वतः ‎‎रिंगणात नसेल, मात्र माझ्या पत्नीला निवडणुकीत ‎‎उतरवणार आहे. महाविकास आघाडीतील ‎‎घटकपक्षांशी चर्चा करून लवकरच पुढील धोरण ‎‎ठरवू, असे किरण पाटील डोणगावकर यांनी ‎‎सांगितले. नवीन निर्णयामुळे अनेक नवीन‎उमेदवार निवडणुकीत दिसणार आहेत.‎ इनसाइड स्टोरी‎- नेते बाहेर काढणार फॅमिली कार्ड‎ निवडणूक लढवता येणार नसली तरी‎बँकेवरील पकड ढिली होऊ नये यासाठी‎नेत्यांनी ‘फॅमिली कार्ड’ वापरण्यास सुरुवात‎केली आहे. खासदार संदिपान भुमरे १९९७‎पासून बँकेचे संचालक होते. आता त्यांचे पुत्र‎आमदार विलास भुमरे लढणार आहेत.‎खासदार भुमरे यांनी दुजोरा दिला आहे.‎भाजपबरोबर चर्चा करून निवडणूक‎बिनविरोध करण्याचा सेनेचा प्रयत्न अाहे.‎ जूनमध्ये निवडणुकीची‎ शक्यता, तयारीला वेग‎ बँकेची प्रारूप मतदार यादी जाहीर‎झाली असून ६ मेपर्यंत हरकती‎नोंदवता येतील. १८ मेपर्यंत त्यावर‎सुनावणी होईल आणि २१ मे रोजी‎अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली‎जाईल. कोणतीही न्यायालयीन‎अडचण न आल्यास जून‎महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या‎आठवड्यात मतदान होण्याची दाट‎शक्यता वर्तवली जात आहे.‎ भाजपची स्वतंत्र लढण्याची‎ तयारी; महायुतीत पेच?‎ जिल्हा बँकेत पुन्हा एकदा महायुती विरुद्ध‎महाविकास आघाडी असा सामना रंगण्याची‎शक्यता आहे. मात्र, भाजपने या वेळेस‎आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपचे‎शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी सांगितले‎की, “मनपा आणि जिल्हा परिषदेनंतर आता‎आमचे लक्ष जिल्हा बँकेवर आहे.‎महायुतीतील पक्षांशी चर्चा करू, पण‎समन्वय न झाल्यास स्वतंत्र लढण्याची‎आमची पूर्ण तयारी आहे.’‎

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!