सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले, तर महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्त्याला आणि जनतेला मनापासून आनंद होईल. पक्षाचे जिल्हाध्यक्ष, प्रमुख कार्यकर्ते आणि आमदारांची अशीच इच्छा आहे की सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते व विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केले आहे. सुनील शेळके यांच्यानंतर आता अण्णा बनसोडे यांनी देखील विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा काढल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अण्णा बनसोडे म्हणाले, शरद पवार हेत आमच्यासाठी दैवत आहेत आणि त्यांचा प्रदीर्घ अनुभव सर्वांना मान्य आहे. मात्र 1999 पासून अजितदादांसोबत काम करत आलो आहे. आता सुनेत्रा वहिनींनी राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी जबाबदारी स्वीकारली आहे, ती त्या उत्तम प्रकारे पार पाडतील, असा विश्वास बनसोडे यांनी व्यक्त केला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आम्हाला आनंद पुढे बोलताना अण्णा बनसोडे म्हणाले, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आम्हाला आनंद होईल. आम्ही सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व स्वीकारले आणि आता सर्व नेते आमदार यांनी इच्छा व्यक्त केली आहे की सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात दोन्ही राष्ट्रवादी एक व्हाव्यात. अजित पवार यांनी विलीनीकरणाबाबत कधीही चर्चा केलेली नव्हती. आता आम्हाला विश्वास आहे, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात आम्ही व्यवस्थित पुढे जात आहोत आणि विलीनीकरणाबाबत योग्य निर्णय होईल. तटकरे आणि पटेल पक्षावर कब्जा करत आहेत का? सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल पक्षावर कब्जा करत आहेत का, असा प्रश्न विचारला असता अण्णा बनसोडे म्हणाले, या आरोपात तथ्य नाही. तसेच सुनेत्रा पवार निर्णय घेण्यास कमी पडत आहेत का? यावर बनसोडे म्हणाले, त्यांनी आत्ताच कारभार हाती घेतला आहे. सर्वांचा विचार करून निर्णय घेतात. तसेच जय पवार यांची पत्रकार परिषद तटकरे आणि पटेल यांनी अडवली का? यावर आपल्याला काही माहीत नसल्याचे बनसोडे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत:सुनील शेळकेंच्या विधानाने खळबळ; सुनील तटकरेंनी मांडली पक्षाची भूमिका गेल्या काही दिवसांपासून थंडावलेला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्दा आमदार सुनील शेळके यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जर दोन्ही पक्ष एकत्र येणार असतील आणि सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढत असेल, तर विलीनीकरणासाठी अजूनही वेळ गेलेली नाही, असे सूचक विधान शेळके यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाची अधिकृत भूमिका मांडली आहे. वाचा सविस्तर
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर मनापासून आनंद होईल:सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात एकजुटीने काम करण्याची आमदारांची इच्छा- अण्णा बनसोडे
-
By सुरेश पाचभाई
- March 29, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
झिशान सिद्दिकींच्या शपथेवरून राजकीय वादंग:इंग्रजीत शपथ म्हणजे...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 14, 2026
अजितदादांची झलक, जयदादांचा जनता दरबार:बारामतीत नागरिकांची मोठी...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 14, 2026
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्येचा फैसला लांबणीवर:पद्मसिंह पाटीलांसह...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 14, 2026
पिंपरी-चिंचवड हादरले!:आरपीआय कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल मोरेंची...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 14, 2026
परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत इंधन वाचवा:मोदींवर जितकी टीका...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 14, 2026
विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 10 आमदारांचा शपथविधी:सभापती राम...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 14, 2026
