ब्रेकिंग न्यूज
10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात… Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं
SP News Maregaon

अखेर श्रीरामपूरची ‘बिनवेशीचे गाव’ ही नकारात्मक ओळख पुसणार:19 मार्च 2026 रोजी कामाचा शुभारंभ श्रीरामपूर-बेलापूर हद्दीवरील ऐतिहासिक वेशीचे काम पूर्णत्वाकडे‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


श्रीरामपूर म्हणजे बिनवेशीचे गाव…” शहराबद्दल नेहमीच व्यक्त केले जाणारे हे नकारात्मक मत आता कायमचे इतिहासजमा होणार आहे. तत्कालीन आमदार दिवंगत जयंत ससाणे यांनी श्रीरामपूरची ही ओळख पुसण्यासाठी बेलापूर-श्रीरामपूर हद्दीवर वेस उभारण्याचा पुढाकार घेतला होता. मात्र, त्यांच्या निधनानंतर अनेक वर्षे हे काम रखडल्याने नागरिकांमधून खंत व्यक्त होत होती. आता अखेर हे काम पूर्णत्वाकडे जात असून, श्रीरामपूरची नवी ओळख ‘वेशीचे गाव’ म्हणून होणार आहे. शहराच्या निर्मितीच्या इतिहासात डोकावल्यास, पूर्वी बेलापूर हे मुख्य गाव होते. रेल्वे स्थानकाला आजही ‘बेलापूर’ असंच नाव आहे. श्रीरामपूरची स्थापना नंतरच्या काळात झाल्याने शहराला वेशी नव्हत्या. यामुळे शहरात काही अप्रिय घडले की, ‘बिनवेशीचे गाव’ म्हणून कळत-नकळत बदनामी केली जायची. ही डागाळलेली प्रतिमा पुसण्यासाठी स्व. ससाणे व त्यांच्या मित्रमंडळाने बेलापूर हद्दीवर वेस उभारली. एवढेच नव्हे तर संगमनेर, नेवासे आणि पुणतांबा रस्त्यावरही अशीच प्रवेशद्वारे उभारण्याचे त्यांचे नियोजन होते. मात्र स्व. ससाणे यांच्या निधनानंतर या अर्धवट वेशीकडे दुर्लक्ष झाले. आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाणे, सन्मित्र मंडळ आणि माजी स्व. जयंतराव ससाणे मित्रमंडळाने यासाठी पुढाकार घेतला. १९ मार्च २०२६ रोजी या वेशीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. ते आता अंतिम टप्प्यात आहे. ‘दिव्य मराठी’च्या पाठपुराव्याला यश श्रीरामपूरच्या या प्रश्नाकडे ‘दिव्य मराठी’ने सातत्याने लक्ष वेधले होते. ५ जून २०२३ च्या अंकात ‘श्रीरामपूरमध्ये उभारलेली वेस पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे कान टोचले होते. ‘दिव्य मराठी’च्या या वृत्तानंतर तीन वर्षांनी या कामाला मुहूर्त मिळाला . ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केलेले वृत्त. छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नामकरण या ऐतिहासिक वेशीला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ असे नाव देण्यात येईल, अशी घोषणा आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी केली होती. त्याप्रमाणे या प्रवेशद्वाराचे नामकरण करण्यात आले असून, काम पूर्ण होताच याचे अधिकृत आणि लोकार्पण केले जाणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर