Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

अशोक खरात प्रकरण महाराष्ट्रासाठी कलंक:भोंदू बाबाशी सत्ताधाऱ्यांचे लागेबांधे; विरोधी पक्षनेता न नेमणे हा सत्तेचा माज- नाना पटोले

अशोक खरात प्रकरण महाराष्ट्रासाठी कलंक आहे. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. त्या भोंदू बाबासोबत सरकारमधील अनेकांचे संबंध असल्याचे पुढे आले आहे. सरकारच्या पापाचा घडा भरला आहे, आता ते भांडे फुटायची वेळ आली आहे, यामध्ये जे राजकारण सुरू आहे. हे अवैध धंदे सुरू होते त्यावेळी पोलिस झोपले होते का? असा सवालही पटोलेंनी केला आहे. नाना पटोले म्हणाले की, भाजपकडून लोकशाहीचा खून करण्यात आल्याचे दिसून आले. त्यांनी दोन्ही सभागृहात आपल्याला हवे तसे काम करता यावे म्हणून विरोधी पक्षनेता नेमला नाही.राज्यावर ज्यांचे दुरगामी परिणाम
होतील असे कायदे पारित केले गेले. त्यामध्ये धर्मस्वातंत्र्याचा असो की महसूलचा कायदा असे बरेच कायदे आणले त्यातून शेतकऱ्यांना बरबाद करण्याचे ठरवले आहे. सर्वसामान्य जनतेला लुटायचे कायदे त्यांनी पारित केले. हे लोकशाही न मानणारे सरकार आहे. त्यांच्याकडून लोकशाहीची हत्या झाली. रॉकेल कुणासाठी? नाना पटोले म्हणाले की, सरकार बहीनींकडून 5 हजार रुपये काढून घेतले जातात. यावर मुख्यमंत्री बोलत नाही. त्यांनी सर्व विषयावर बोलले पाहिजे. सरकारकडून लाडक्या बहिणींच्या नावाने महिलांची फसवणूक करण्यात आली. सरकारकडून महिलांचा अपमान करण्यात येत आहे. रॉकेलचे तेल 86 रुपये दराने दिले जाणार आहे. रॉकेल कुणासाठी आणले जात आहे हे स्पष्ट नाही. गॅस असणाऱ्यांना त दिले जात नाही, मग त्यासाठी कोणाला पात्र ठरवले जाईल हे सरकारने स्पष्ट केले पाहिजे. रॉकेल गरिबांसाठी देणार की श्रीमंत लोकांना देणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. महायुतीकडून बहिणींच्या पैशांचा केवळ इव्हेंट नाना पटोले म्हणाले की, प्रत्येकच सरकार योजना सुरू करत असते. आम्ही सुद्धा संजय गांधी निराधार योजना सुरू केली होती. त्यामध्ये महिला, पुरुष होते पण काँग्रेसने त्यांचे पैसे देताना या आठवड्यात पैसे देतो त्या आठवड्यात पैसे देतो असे करत त्याला प्रसिद्धी दिली नाही. मात्र हे सरकार लाडकी बहीणचे पैसे या दिवशी देणार त्या दिवशी देणार असे सांगत प्रसिद्धी करते. हे पैसे काही त्यांच्या घरचे नाहीत. सत्ता आली तर 2100 रुपये देणार म्हणणारे आता सरकार येऊन सुद्धा 1500 रुपयेच देत आहे ते सुद्धा 3 महिन्यातून एकदा देत आहे. लाडक्या बहिणींना या लोकांनी धोका दिला. काँग्रेस काळातील योजना लोकांसाठीच्या होत्या. भाजप केवळ दिखावा करते.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!