पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या निकालानंतर राजकीय वातावरण तापले असून भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी ‘इंडिया’ आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी आघाडीला बाजूला सारून निवडणूक लढवली, मात्र या निकालांनी आघाडीचे अस्तित्वच धोक्यात आणल्याचे त्यांनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी आणि एम. के. स्टॅलिन हे उद्धव ठाकरेंचे जवळचे मित्र होते. मात्र, जनतेने या दोघांनाही घरी पाठवले आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी आघाडीला महत्त्व न देता स्वतंत्रपणे निवडणूक लढवली, ज्यामुळे आता त्या आघाडीत कुणीही उरलेले नाही. नवनाथ बन म्हणाले की, या आघाडीत आता केवळ काँग्रेस उरली आहे. मात्र, काँग्रेसचे स्वतःचे भवितव्य काय आहे, हे राहुल गांधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगलेच ठाऊक आहे. विरोधक कितीही एकत्र येण्याचा प्रयत्न करत असले, तरी जमिनीवर त्यांचे अस्तित्व संपत चालले आहे. राऊतांनी पाकिस्तानात जावे नवनाथ बन म्हणाले की, इंडिया आघाडीला देशात तर उबाठाला महाराष्ट्रात निवडणूक जिंकणे अवघड दिसत आहे. संजय राऊत यांना पुन्हा महाराष्ट्रातून राज्यसभेवर संधी मिळेल असे वाटत नाही. त्यामुळे राऊतांनी पाकिस्तानमध्ये जात खासदारकीची निवडणूक लढवावी.कारण त्यांची तिथे चांगली चालते. ते त्यांचा उदोउदो करतात. ठाकरे, राऊत यांनी पाकिस्तानमध्ये पक्ष वाढवावा, आणि भारताचे नागरिकत्व सोडावे. राउतांमुळे अवस्था वाईट नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी एक अश्वकोश निर्माण केला पाहिजे. संजय राऊत जी भाषा वापरतात त्यासाठी शब्दकोश ही तर अश्वकोश लागेल. कारण त्यांच्या बोलण्यामुळे उबाठा गटाला अश्व लागले आहेत. त्यांच्या पक्षाची अवस्था वाईट झाली आहे. त्या अश्चकोशाचे प्रकाशन उद्धव ठाकरेंच्या हस्ते करावे, जेणेकरून त्यांच्या पक्षाची अधोगती का झाली हे महाराष्ट्राला समजेल. निवडणूक हरले की राऊत काय काय शब्द शोधून काढतात. त्यांच्या पक्षाला अश्च कसे लागले हे यातून कळते. ..तर राऊतांना मिर्च्या झोंबतात नवनाथ बन म्हणाले की, पश्चिम बंगाल, आसाममध्ये भाजप जिंकले तर लोकशाहीसाठी घातक आहे. आणि केरळमध्ये काँग्रेस जिंकले तर लोकशाहीचा विजय असतो, तामिळनाडूमध्ये विरोधक जिंकले तर तिथे लोकशाहीचा विजय असतो. अन् भाजप जिंकले तर राऊतांना मिर्च्या झोंबतात. निवडणूक या पापात सहभागी नाहीत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी जी दादागिरी केली, जे पाप केले ते धुण्याचे काम जनतेने केले आहे. तिथे अनेक वर्षे दीदीच्या गुंडानी महिलावर अत्याचार केले ते पाप धुण्याचे काम जनतेने केले. उद्धव ठाकरेंचे अडीच वर्षांचे पाप धुण्याचे काम एकनाथ शिंदेंनी केले. मग देवाभाऊंचे राज्य आले. काँग्रेस जिंकली की विजय, भाजप जिंकली की संशय नवनाथ बन म्हणाले की, तामिळनाडू, केरळमध्ये एसआयआर झाले तिथे विरोधक जिंकले. आणि पश्चिम बंगालमध्ये भाजप जिंकली तर तुम्हाला इतक्या मिर्च्या का लागत आहेत. निवडणूक आयोग, एसआयआा केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगालमध्ये काम करत होते पण तुमचा विजय झाला त्यावर तुम्ही आक्षेप घेत नाही. पण भाजपला जनतेने निवडून दिले की तुम्हाला मिर्च्या झोंबतात.
राऊतांनी पाकिस्तानात जावून निवडणूक लढवावी:ममता-स्टॅलिन घरी गेले, ‘इंडिया’ आघाडीत आता फक्त काँग्रेसच शिल्लक- नवनाथ बन
-
By सुरेश पाचभाई
- May 5, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
मारेगावात मेच्या तडाख्यानंतर पावसाची दमदार एन्ट्री; नागरिकांना...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 7, 2026
रायगडमध्ये शिंदेसेना-काँग्रेस एकत्र; म्हसळा नगरपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता...
4views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 7, 2026
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादीत चुरस:’राज्यसभेसाठी माझा...
4views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 7, 2026
‘एमएसएफडीए’च्या सुधारित संकेतस्थळाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 7, 2026
नागपूर हादरले:इन्स्टाग्रामवरील ‘प्रेम त्रिकोण’ ठरला जीवघेणा, कळमना...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 7, 2026
