ब्रेकिंग न्यूज
श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी
SP News Maregaon

गायीचे शेण आणि गोमुत्र शेतीसाठी आहे शुद्ध सोनं:शेतीचे अर्थकारण बदलण्यासाठी हवा योग्य वापर

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


“शेतकरी जोपर्यंत गाईला समजून घेत नाही, तसेच गाईच्या शेणाचा आणि गोमूत्राचा योग्य वापर करत नाही, तोपर्यंत शेतीचे खरे अर्थकारण फायद्याचे होणार नाही. गोमूत्र हे लाखो रुपयांची धनदौलत आहे. रासायनिक खतांच्या तुलनेत ते शुद्ध सोन्यासारखे आहे. गाईचे महत्त्व शेतकऱ्यांना समजले, तर शेती आणि शेतकऱ्यांचे भविष्य निश्चित बदलू शकते, असे प्रतिपादन गोसेवक परमेश्वर तळेकर यांनी व्यक्त केले. ग्राम सुधार समितीच्या माध्यमातून कोटलींग मंदिर चिखलठाण येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जिव्हाळा ग्रुप’च्या स्नेहमेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तळेकर पुढे म्हणाले की, रासायनिक खतांच्या अतिरेकामुळे केवळ शेतीच नव्हे तर माणसांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. जर निरोगी जीवन हवे असेल, तर देशी गाई आणि सेंद्रिय शेतीचा स्वीकार करावा लागेल. आज लोक डॉक्टरांवर हजारो रुपये खर्च करतात; पण स्वतःच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पारंपरिक आणि नैसर्गिक उपायांकडे दुर्लक्ष करतात. हीच परिस्थिती बदलण्याची गरज आहे. कार्यक्रमात राजेंद्र बारकुंड यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर गजेंद्र पोळ यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी राजेंद्र रणसिंग, निळकंठ ताकमोगे, प्रशांत नाईकनवरे, कैलास लबडे, सचिन गव्हाणे, आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. विज्ञान अन् अध्यात्माची सांगड घाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंद पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष सुराणा हे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालण्याची गरज अधोरेखित केली. “विज्ञान आणि अध्यात्म या दोन्हींचा समतोल साधत वाटचाल केली, तरच समाजाची खरी प्रगती होईल. अंधश्रद्धेला खतपाणी घातले, तर कोणाच्याही जीवनाचे कल्याण होणार नाही,

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर