हिंगोली जिल्हा पोलिस दलातील सुमारे १५० पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या शुक्रवारी ता २२ पारदर्शक आणि समुपदेशन पद्धतीने करण्यात आल्या. जिल्हा पोलिस अधीक्षक निलाभ रोहन तसेच अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांच्या उपस्थितीत ही बदली प्रक्रिया पार पडली. या बदली प्रक्रियेने कर्मचाऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे जिल्हा पोलिस दलातील सुमारे 900 कर्मचाऱ्यांपैकी एकाच पोलिस ठाण्यात मागील पाच वर्षापासून कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या हालचाली सुरू होत्या. बदली प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली होती. त्यानुसार बदलीस पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांकडून बदलीसाठी त्यांना हवे असलेल्या तीन पोलिस ठाण्यांचे विकल्प मागविण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी (ता. २२) सकाळी दहा वाजल्यापासून प्रत्यक्ष बदली प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी दिलेल्या पर्यायांनुसार संबंधित ठिकाणी जागा रिक्त असल्यास तत्काळ त्या पोलिस ठाण्यात बदली देण्यात आली. यावेळी काही कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक व कौटुंबिक अडचणी देखील प्रशासनाने जाणून घेतल्या. विशेष म्हणजे अडचणीची परिस्थिती असलेल्या काही कर्मचाऱ्यांना त्याच ठिकाणी एका वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यामुळे बदली प्रक्रियेत मानवी दृष्टिकोन जपण्यात आल्याची भावना कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे. समुपदेशन पद्धतीने झालेल्या या बदल्यांमुळे पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. इच्छित ठिकाणी बदली मिळाल्याने कर्मचाऱ्यांचे मनोबल आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाने राबविलेल्या या पारदर्शक बदली प्रक्रियेचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
हिंगोली जिल्ह्यात १५० पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या:समुपदेशन पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधान
auto_awesomeथोडक्यात महत्त्वाचे
हिंगोली जिल्हा पोलिस दलातील सुमारे १५० पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या शुक्रवारी ता २२ पारदर्शक आणि समुपदेशन पद्धतीने करण्यात आल्या. जिल्हा पोलिस अधीक्षक निलाभ रोहन तसेच अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांच्या...