ब्रेकिंग न्यूज
जळका शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अखेर मार्गी पंढरपूर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मारेगाव पोलिसांचे मोठे पाऊल २०१५ पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या विद्युत शॉर्टसर्किटने शेतमजुराचे घर जळून खाक आगीत बाधित कुटुंबाला शिवसेना (उ.बा.ठा.)कडून तातडीची मदत शॉर्टसर्किटचा संशय; सगणापूरमध्ये घराला भीषण आग, गरीब कुटुंबाचा संसार राख संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगावात समाजसेवेचा जल्लोष वेगाव येथे २० वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल:NCERTच्या पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश म्हणजे संविधानाच्या मूल्यांवर घाला; हा ग्रंथ जातीय भेदभावाला धार्मिक मान्यता देणारा SC आरक्षण उपवर्गीकरणावर महायुती सरकारची कोंडी?:27 आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; ‘बदर समिती’चा अहवाल जाहीर करा, उद्या विधानभवनावर मोर्चा
SP News

हिंगोली जिल्ह्यात १५० पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या:समुपदेशन पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधान

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली जिल्हा पोलिस दलातील सुमारे १५० पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या शुक्रवारी ता २२ पारदर्शक आणि समुपदेशन पद्धतीने करण्यात आल्या. जिल्हा पोलिस अधीक्षक निलाभ रोहन तसेच अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांच्या उपस्थितीत ही बदली प्रक्रिया पार पडली. या बदली प्रक्रियेने कर्मचाऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे जिल्हा पोलिस दलातील सुमारे 900 कर्मचाऱ्यांपैकी एकाच पोलिस ठाण्यात मागील पाच वर्षापासून कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या हालचाली सुरू होत्या. बदली प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली होती. त्यानुसार बदलीस पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांकडून बदलीसाठी त्यांना हवे असलेल्या तीन पोलिस ठाण्यांचे विकल्प मागविण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी (ता. २२) सकाळी दहा वाजल्यापासून प्रत्यक्ष बदली प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी दिलेल्या पर्यायांनुसार संबंधित ठिकाणी जागा रिक्त असल्यास तत्काळ त्या पोलिस ठाण्यात बदली देण्यात आली. यावेळी काही कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक व कौटुंबिक अडचणी देखील प्रशासनाने जाणून घेतल्या. विशेष म्हणजे अडचणीची परिस्थिती असलेल्या काही कर्मचाऱ्यांना त्याच ठिकाणी एका वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यामुळे बदली प्रक्रियेत मानवी दृष्टिकोन जपण्यात आल्याची भावना कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे. समुपदेशन पद्धतीने झालेल्या या बदल्यांमुळे पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. इच्छित ठिकाणी बदली मिळाल्याने कर्मचाऱ्यांचे मनोबल आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाने राबविलेल्या या पारदर्शक बदली प्रक्रियेचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर