ब्रेकिंग न्यूज
जळका शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अखेर मार्गी पंढरपूर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मारेगाव पोलिसांचे मोठे पाऊल २०१५ पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या विद्युत शॉर्टसर्किटने शेतमजुराचे घर जळून खाक आगीत बाधित कुटुंबाला शिवसेना (उ.बा.ठा.)कडून तातडीची मदत शॉर्टसर्किटचा संशय; सगणापूरमध्ये घराला भीषण आग, गरीब कुटुंबाचा संसार राख संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगावात समाजसेवेचा जल्लोष वेगाव येथे २० वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल:NCERTच्या पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश म्हणजे संविधानाच्या मूल्यांवर घाला; हा ग्रंथ जातीय भेदभावाला धार्मिक मान्यता देणारा SC आरक्षण उपवर्गीकरणावर महायुती सरकारची कोंडी?:27 आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; ‘बदर समिती’चा अहवाल जाहीर करा, उद्या विधानभवनावर मोर्चा
SP News

‘रिटर्न गिफ्ट’ असावे तर असे!:लग्नात 3500 गावकऱ्यांना दिला अपघाती विमा; PM मोदींकडून पेठकर कुटुंबाचे कौतुक

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथील सिद्धेश्वर पेठकर यांच्या विवाहसोहळ्याची सध्या संपूर्ण देशात चर्चा होत आहे. पेठकर कुटुंबीयांनी लग्नाचे ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणून सुमारे साडेतीन हजार गावकऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा अपघाती विमा काढून दिला आहे. या अनोख्या आणि समाजोपयोगी उपक्रमाची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून, आजच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून त्यांनी या घटनेची माहिती संपूर्ण देशाला देत पेठकर कुटुंबाचे भरभरून कौतुक केले. ‘मन की बात’ कार्यक्रमात देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्या देशात वाढदिवस किंवा लग्नकार्य हे केवळ कौटुंबिक कार्यक्रम नसून तो संपूर्ण समाजाचा उत्सव असतो. आपला आनंद इतरांसोबत वाटावा, अशी प्रत्येक कुटुंबाची इच्छा असते आणि त्यातूनच पाहुण्यांना भेटवस्तू दिल्या जातात. परंतु, महाराष्ट्रातील नांदेडमधील बहादरपुरा गावात राहणाऱ्या पेठकर कुटुंबाने आपला आनंद वाटण्यासाठी असा एक निर्णय घेतला आहे, जो सर्वांसाठी चर्चेचा विषय बनला आहे. जर आनंद वाटायचाच असेल, तर कठीण काळात एखाद्या कुटुंबाला आधार देणारी गोष्ट द्यावी, या विचारातून त्यांनी घरातील विवाहाच्या निमित्ताने गावातील जवळपास साडेतीन हजार लोकांसाठी अपघात विम्याची व्यवस्था केली, असे पंतप्रधानांनी सांगितले. या उपक्रमामागील भावना अत्यंत हृदयस्पर्शी असल्याचे सांगत, अपघातानंतर कुटुंबांना येणाऱ्या आर्थिक अडचणींच्या काळात ही छोटीशी मदतही खूप मोठा आधार बनेल, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाची प्रशंसा केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर