ब्रेकिंग न्यूज
News 18 Marathi Headlines | 21 Aug | 9 AM | Kurla-Trombay Railway News | Auto Taxi Fare Price News सोशल मीडियावर फोटो पाहिला, गायिकेला फोन केला, जेवायला बोलावलं अन्…, कोल्हापूरच्या तरुणाचं भयंकर कांड Virender Sehwag Son : जसा बाप तसा बेटा! सेहवागच्या लेकाचा धमाका, सेम टू सेम कव्हर ड्राईव्ह; 157 च्या स्ट्रा… मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील गोसाई विठुजी कापसे यांचे निधन Jalgaon Crime News | नशिराबादमध्ये पोलिसाच्या घरात सशस्त्र दरोडा | Police Naik Ganesh Koli कमी खर्चात शेतीतून मिळेल भरघोस उत्पन्न, जमिनीच आरोग्य जपण्यासाठी 3 गोष्टी कराच, Video अवघ्या 5 वर्षांची चिमुकली, स्वातंत्र्यदिन कार्यक्रमावरून घरी आली, रिक्षावाल्यानं चॉकलेट दिलं अन्… भयंकर क… Eknath Shinde: कुणबी जात प्रमाणपत्राचा शिंदे गटाला फटका! जातप्रमाणपत्र बोगस आढळल्यानं नगरसेविकेची निवड रद… मारेगावात महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लग्नानंतर सगळं सुरुळीत होतं, पण पतीची भयंकर डिमांड, विवाहितेनं…, छ. संभाजीनगर हादरलं!
SP News Maregaon

पाणीटंचाईचे लोण आता मेळघाटच्या पायथ्याशी; अचलपुरातही पाणीटंचाई:चंद्रभागा धरणावरून येणाऱ्या पाण्याचा दाब कमी‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी | अचलपूर चंद्रभागा धरणावरून पाण्याचा दाब कमी झाल्याने मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या परतवाडा-अचलपुर या जुळ्या शहरातही गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शहराच्या टंचाईग्रस्त भागात नगरपालिकेतर्फे टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. चंद्रभागा धरणावरून येणाऱ्या पाण्याचा दाब सध्या प्रचंड कमी झाला आहे. परिणामी अचलपूर शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. जलवाहिनीत कमी दाबाने पाणी येत असल्याने शहरातील अनेक भागांचा नियमित पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. नगरपालिकेच्या माहितीनुसार, कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने देवगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रातून येणाऱ्या पाण्याने जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरता येत नाहीत. त्यामुळेच काही प्रभागांमध्ये अत्यल्प दाबाने पाणीपुरवठा होत आहे, तर काही भागात दोन ते तीन दिवसांपासून पाणीपुरवठा चक्क बंद असल्याची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर अचलपूर नगरपालिकेने तातडीने उपाययोजना करत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. ज्या भागात पाण्याची तीव्र टंचाई आहे, त्या परिसरात टँकर पाठवून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जलसंपदा विभागाशी समन्वय साधून आवश्यक तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी मुख्याधिकारी धीरज गोहाड, अभियंता मनिष शर्मा, जलसंपदा अभियंता चिरायु मनोहर, नगरसेवक राज पाटील यांनी धरण स्थळी भेट देऊन आवश्यक तांत्रीक बाबी जाणून घेतल्या. त्याचप्रमाणे देवगांव येथील जलशुध्दीकरण केंद्रावरील तांत्रीक बाबी जाणून घेत सबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती उपाययोजना करण्याबाबत सुचना केल्या. तर दुसरीकडे पाणी समस्येवर काम सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.तर काही भागात दोन ते तीन दिवसांपासून पाणीपुरवठा चक्क बंद असल्याची परिस्थिती आहे. प्रशासनाकडून उपाययोजनेवर भर चंद्रभागा धरणावरून येणाऱ्या पाण्याचा दाब कमी झाल्यामुळे तात्पुरती पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना कमी त्रास व्हावा यासाठी पालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाशी सतत संपर्क ठेवून तांत्रिक अडचणी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद आहे, त्या भागांना प्राधान्याने पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. ब्राम्हणसभा सह इतर भागातील पाणीटंचाईसाठी लवकरच कायमस्वरुपी तोडगा काढल्या जाईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर